शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

माढा लोकसभा मतदारसंघाचा दुष्काळ हे बारामतीकरांचं पाप : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 10:54 IST

फलटणपासून ते सांगोल्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघच दुष्काळी आहे. मात्र या दुष्काळी भागाकडे राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही पाणी प्रश्नावरच लढविली जाते.

ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला येथे प्रचार सभादुष्काळी मतदारसंघाचा पाणीप्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी म्हणून मी अपयशी ठरलो तर पुन्हा मते मागण्यासाठी येणार नाही : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

सांगोला : माढा लोकसभा मतदारसंघाचा दुष्काळ हे बारामतीकरांचं पाप आहे, अशी टीका करीत माढ्यातून सर्वप्रथम निवडणूक लढविताना देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगोल्यात मावळत्या सूर्याची शपथ घेऊन येथील दुष्काळ हटविण्याचा निर्धार व्यक्त केला होता़ मात्र याच शरद पवार यांनी दुष्काळी भागातील पाणी अडवून ते बारामतीला पळविले, असा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.

ज्या मतदारसंघात सेनापतीच निवडून येऊ शकत नाही, तेथे सैनिकाला बळीचा बकरा बनविण्यात आला, असे सांगून रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटणपासून ते सांगोल्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघच दुष्काळी आहे. मात्र या दुष्काळी भागाकडे राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही पाणी प्रश्नावरच लढविली जाते. त्यामुळे या दुष्काळी मतदारसंघाचा पाणीप्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी म्हणून मी अपयशी ठरलो तर पुन्हा मते मागण्यासाठी येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, नगराध्यक्ष राणी माने, तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे, मधुकर बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी राजश्री नागणे, श्रीकांत देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही मनोगतातून विरोधकांवर टीका केली़  

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस