शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

ढाळा ओ... बळीराजानं करुन दाखवलं, केवळ पावसाच्या पाण्यावर ३१० क्विंटल हरभरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:16 IST

सोलापूर/ अक्कलकोट : कोण म्हणतं शेतीत काही राम नाही.. केल्यानं होत आहे रे आधी केलेचि पाहिजे या उक्तीनुसार नागणसूरच्या ...

सोलापूर/अक्कलकोट : कोण म्हणतं शेतीत काही राम नाही.. केल्यानं होत आहे रे आधी केलेचि पाहिजे या उक्तीनुसार नागणसूरच्या सेवानिवृत्त शेतकऱ्यानं आपल्या तीस एकर जिराईत शेतात चक्क ३१० क्विंटल हरभरा पिकाचं उत्पन्न घेऊन आपली प्रगती साधली आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर एवढे उत्पन्न मिळवण्याची ही अक्कलकोट तालुक्यातील पहिली घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील बसवराज सिद्रामप्पा कोनापुरे या सेवानिवृत्त शिक्षकाची ३० एकर जिरायत शेती आहे. पाण्याचं स्रोत नसले, तरी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली. यामुळे त्यांच्या तीन पिढ्यांमध्ये झालं नाही एवढं ३१० क्विंटल हरभरा पिकाचं उत्पन्न घेतलं. तालुक्यात रेकॉर्ड त्यांनी मोडलं आहे.

नागणसूर येथे कोनापुरे यांची पिढीजात शेती आहे. दरवर्षी याच क्षेत्रामध्ये कधी तूर, तर कधी हरभरा असे आलटून पालटून पिके घेतात. आतापर्यंत याच क्षेत्रात सर्वाधिक २५० क्विंटल उत्पादन निघाले आहे. यंदा सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांची अनेक पिके हातून गेली आहेत. कोनापूरे यांनी कर्नाटक राज्यातून ‘अणेगिरी’ या जातीचे ११ क्विंटल बियाणे आणले होते. यातून तब्बल ३१० क्विंटल विक्रमी उत्पादन मिळाले. सध्याचा बाजारभाव प्रतिक्विंटल ५ हजार रुपये आहे. त्यानुसार तब्बल १५ ते १६ लाख रुपये होतील. तालुक्यात नेहमीच नागणसूर शिवारात दरवर्षी हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असते.

यामुळे मिळालं विक्रमी उत्पादन

तीस एकर जिराईत क्षेत्रामध्ये कर्नाटक राज्यातून ‘आणेगिरी’ नावाचे ११ क्विंटल बियाणे आणले. पारंपरिक पद्धतीने पेरणी केली. १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाच वेळा कीटकनाशके व टॉनिक औषध फवारले. एकरी एक पोते डीएपी रासायनिक खताची मात्रा दिली. एक वेळा खुरपणी केली, एक वेळा कुळव मारला अशा शंभर दिवसांच्या कालावधीत नियमितपणे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामुळे विक्रमी उत्पादन मिळाले.

पूर्वजापासून आमची शेती आहे. या क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक २५० क्विंटल उत्पादन निघालेले होते. यंदा वातावरण खराब असतानाही मला बंपर उत्पन मिळाले. ३० एकर जमिनीत तब्बल ३१० क्विंटल हरभरा निघाला. आतापर्यंत जिराईत क्षेत्रात एकरी पाच क्विंटल उच्चांकी उत्पादन मिळालेले आहे. मला १० क्विंटल उत्पन्न मिळाले. हरभरा सध्या वेअरहाऊस मध्ये ठेवला आहे. भाववाढ होताच विक्री करू.

- बसवराज कोनापुरे, शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीakkalkot-acअक्कलकोट