शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:32 IST

चारित्र्य आणि चरित्र कसं असावं, हे शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांतून अनुभवावं लागेल

आई जिजांऊच्या आज्ञेवर, वडील शहाजीराजांच्या शौर्य, पराक्रमाच्या बाळकडूवर, रयतेच्या मनावर आणि तलवारीच्या पात्यावर, अष्टौप्रहर रणांगण गाजवणाऱ्या, अष्टावधानी प्रेरणादायी असणाऱ्या, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या, अष्टप्रधान मंडळाकडून रयतेचा कारभार करणाऱ्या बलवंत, यशवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, प्रजाहितदक्ष, जाणता राजा शिवाजी महाराजांची जयंती आपण उत्साहाने साजरी करत आहोत...

बालशिवबांनी लहानपणीच माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून स्वतःला जाणून घेऊन, सोबतीला जिवाभावाचे मावळे घेऊन, रयतेचा खरा अर्थ जाणून घेतला व पुढे आयुष्यभर रयतेसाठी जिवाशी खेळत राहिले. इंग्रज, पोर्तुगीज, आदिलशहा औरंगजेब, डच, सिद्दी यांची सत्ता महाराजांपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ होती. शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक लढत ही लक्षवेधी होती. मनुष्य जीवनात एखाद्या क्षेत्रात माणसाचं अवधान यशस्वी होऊ शकतं; परंतु शिवराय यासाठी अपवाद ठरले. जीवनातील सर्वच आघाड्यांवर यशस्वीपणे मात करत शून्यातून स्वराज्याचे विश्व निर्माण करणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श जगापुढे आहे.

रयतेचा स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य, स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठी जिवाचं रान केलं. वतनदारी बंद करून वेतनदारी सुरू केली. पगाराची पहिली सुरुवात छत्रपतींनी केली. सर्व जातीधर्मांच्या जिवलग मावळ्यांना अष्टप्रधान मंडळात स्थान देऊन जनतेचा कारभार लोकप्रिय आणि न्यायप्रिय केला. जमीनमोजणी, सातबाराची पद्धत शिवरायांनी केली. पाणी आडवा, पाणी जिरवा... जलसंधारणाला उत्कृष्ट पायवाट घालून दिली. बत्तीस धरणे महाराजांनी बांधली. रायगडावर बंद गटार योजना, शौचालये बांधली. वनराईचे संवर्धन केले. अनेक किल्ले बांधले, अभेद्य असे जलदुर्ग बांधले. भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांच्या दिशादर्शी कार्याचा सर्वांना सदैव पिढ्यानपिढ्या अभिमान वाटत राहील.

चारित्र्य आणि चरित्र कसं असावं, हे शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांतून अनुभवावं लागेल. परस्त्रीला माता म्हणणे ही सामान्य चित्ताची गोष्ट नाही तर हा शिवबांचा संस्कार आहे. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी तेजोमय मार्गदर्शन आहे. शासन, प्रशासन, रयत अधिकाऱ्यांसाठी नसते तर सर्व काही रयतेसाठीच असते. अंतिमतः रयत हीच मालक आहे. बाकी सर्व विश्वस्त आहेत. त्यांनी रयतेशी प्रामाणिकच असलं पाहिजे, तरच त्यांना राज्यकारभार करण्याचा नैतिक अधिकार आहे. महाराजांची ही शिकवण म्हणजेच शिवनीती, शिवसूत्र होते. जे आजही सर्व व्यवस्थेला नितांत मार्गदर्शक व गरजेचे आहे.

छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्त्व सामान्यांना अनाकलनीय होते. अफजलखानालाही प्रश्न पडला होता... शिवरायांचा जीव कशात आहे? मंदिरे, गडकिल्ले, शेतकऱ्यांच्या धान्याचं नुकसान केलं तरी राजे निश्चल होते, खानाने माणसं कापावयास सुरुवात केली. शिवराय गहिवरले, द्रवले, बैचेन झाले. खानाने ओळखले... शिवरायांचा जीव माणसांत आहे, रयतेत आहे. राजे चतुर. समयसूचकतेने परिपूर्ण. अचूक नियोजनात हातखंडा. भाषा रसाळ व मधाळ. त्यांनी खानाला भेटीची विनंती केली. प्रतापगडावरील भेट ठरली. या भेटीतही शिवरायांनी खानाच्या शक्तीचा युक्तीने पराभव केला. शामियाना आकर्षक, रत्नजडित हिऱ्यामोत्यांचा केला. भव्यदिव्य स्वागत करून शिवरायांनी खानाला अगोदर मनात जिंकले, नतंर रणात जिंकले. हे शिवमानसशास्त्र पुढील पिढीसाठी अनंतकाळ मार्गदर्शक आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या राज्याचं नाव स्वराज्य ठेवलं, शिवराज्य नाही. स्वराज्य स्थापनेच्या या स्वधर्म यज्ञामध्ये शिवरायांना या मातीतील, मातीसाठी जागणारी, जगणारी आणि मातीसाठीच बलिदान देणारे मावळे, माणसं भेटली. माणसं, मित्र जोडताना जिजाऊंनीही शिवरायांना कधी विचारलं नाही की, यांच स्टेट्स काय? आपल्या राजावरील निष्ठा हीच शिवरायांच्या संवंगड्यांची प्राणप्रतिष्ठा होती. भगवा हाच मावळ्यांचा वाण आणि प्राण होता. सर्वांनीच तो हयातभर जपला, म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ध्येयवादी मावळ्यांत त्याकाळात बंडखोरी, पाठिंबा मागे घेणे, वाटाघाटी, अपेक्षा, तडजोड, ही भावनाच नव्हती. राजांची प्रचार, प्रसारण यंत्रणा आजच्या मोबाइलपेक्षाही जलद होती. धूर काळा की पांढरा यावरून सांकेतिक खुणा तीनशे साठ किल्ल्यांवर एका तासात संदेश पोहोचत असे. रात्री प्रकाशाचा वापर तर दिवसा ध्वनीच्या साह्याने आपला मनोदय, सर्व सहकारी मावळे दऱ्याखोऱ्यातून बिनचूक पोहोचवत असत.

आजच्या धकाधकीच्या, अनिश्चित, ताणतणावाच्या काळातही, आनंदात राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण अत्यंत गरजेचे आहे.

- ह.भ.प. रंगनाथ काकडे गुरुजी

टॅग्स :SolapurसोलापूरShivjayantiशिवजयंती