शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

आठवड्यात तीन हजार गुजराती माठांची आवक ; बिहारी विक्रेत्यांकडून सोलापुरात घरोघरी विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:03 PM

अहमदाबाद (गुजरात) येथून आठवड्यातून एकदा  हजार माठ ट्रकने सोलापुरात आणतात.

ठळक मुद्देग्राहकांची पसंती : पांढºया रेतीपासून बनतात लाल रंगाचे आकर्षक डेरे, घरोघरी जाऊन व्यवसायपारंपरिक माठापेक्षा कमी किमतीत आणि जास्त थंडगार पाणी मिळत असल्याने माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

यशवंत सादुल

सोलापूर : उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वसामान्यांचे फ्रीज समजल्या जाणाºया माठाची खरेदी करण्याची लगबग सर्वत्र दिसून येते. सध्या पांढºया रेतीपासून बनविलेले लालभडक माठ डोक्यावर घेऊन तसेच सोलापूरच्या गल्लीबोळात, घरोघरी गुजराती माठांची विक्री करणारे बिहारी बांधवही दिसून येत आहेत.

पारंपरिक माठापेक्षा कमी किमतीत आणि जास्त थंडगार पाणी मिळत असल्याने माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. आठवड्यातून तीन हजार माठांची गुजरातमधून येथे आवक होते. बिहारी विक्रेते हे माठ घरोघरी जाऊन विकतात. बिहारमधील पाटणा, मुझ्झफरपूरमधील कुंभार समाजातील शेतकरी असलेले पंधरा ते वीस बिहारी विके्रते मागील दोन वर्षांपासून माठ विकण्यासाठी सोलापुरात येत आहेत. यंदा विजयपूर रोडवर आपला डेरा टाकला आहे. अहमदाबाद (गुजरात) येथून आठवड्यातून एकदा  हजार माठ ट्रकने सोलापुरात आणतात. त्यास रंगरंगोटी करून विक्रीसाठी सज्ज करून ठेवतात. चार ते साडेचार किलो वजनाचा एक माठ असतो. एक विक्रेता साधारणत: २० ते २२ माठ घेऊन सकाळी निघतो.

दिवसभर दोन टप्प्यात ४० माठ विकतात. १५० रुपये किंमत असली तरी टिकाऊपणा आणि पाणी थंड होण्याची खात्री कृतीतून पटवून देतात़ पाच ते सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुंबई, भिवंडी, नालासोपारा, घाटकोपर येथे व्यवसायाच्या निमित्ताने आले़ सोलापुरात व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदा परत आल्याचे रामचंद्र पंडित प्रजापती यांनी सांगितले. 

कर्नाटकातील विजयपूरपर्यंत विक्रीसाठी जात आहेत. उन्हाळा संपला की परत गावाकडे जाऊन शेती, कुंभारकाम करतात. यंदा संजय प्रजापती, सुरिंदर पंडित प्रजापती, विश्वनाथ पंडित, रामचंद्र पंडित,अनिल पंडित यांच्यासह १५ ते २० विके्रते आले असून, गुजराती माठांसोबत पुढच्या वर्षी वजनाने हलके, फक्त मातीचे असणारे, कलाकुसरीच्या राजस्थानी माठ विक्रीसाठी आणणार असल्याचे रमेश शाह प्रजापती यांनी सांगितले.

आठवड्यातून एकदा अडीच ते तीन हजार माठ गुजरातहून येतात़ ते फुटू नयेत म्हणून त्यास गवताचे आवरण असते. तरीही वाहतूक करताना किमान २५ ते ३० टक्के माठ फुटतात. सोलापुरातील ग्राहकांना घरपोच सेवा दिली तरी भाव कमी करण्याची मानसिकता असल्याने वाजवी किमतीत सरासरी दीडशे रुपयांना एक याप्रमाणे विक्री केली जाते.

वाळूमुळे टणकपणा- गुजरातमध्ये नदीच्या पांढºया वाळूपासून माठ बनवितात.त्यात फक्त पंचवीस टक्के मातीच असते़ वाळूमुळे माठ टणक बनून टिकाऊ राहतात़ हाताळताना फुटण्याची शक्यता कमी असते.

पाणी झिरपण्यासोबत कमी वेळेत जास्त थंड होते. इतर माठांच्या तुलनेत कमी किमतीमुळे ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत़ येथील प्रतिसादामुळे पुन्हा सोलापुरात आलो आहोत़- संजय प्रजापती,विके्रते 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळ