शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

एप्रिल उजाडला तरी एकाही गावचा टंचाईचा प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:22 AM

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत ...

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत असत. यंदा एप्रिल महिना उजाडला तरी तालुक्यातील १३१ गावांपैकी अध्याप एकाही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. याचे कारणही तितकेच सत्य आहे. गतवर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. यामुळे सर्वत्र नदी, नाले तुडुंब भरून वाहिले. बोरी, हरणा, भीमा, सीना या नद्यांना महापूर येऊन गेला. परिणामी विहीर, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे कुठेही पाणीटंचाई भासताना दिसत नाही.

तरीही शासनाने पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील संभाव्य ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करणे यांचा समावेश आहे.

संभाव्य पाणीटंचाई असणारी गावे

आंदेवाडी बु., बबलाद, परमानंदनगर, भोसगे व तांडा, बिंजगेर, बोरगाव, बोरोटी बु., बोरोटी खु., चिंचोळी मैं., चिंचोळी न., दहिटणे, दहिटणेवाडी, दोड्याळ, गौडगाव बु., हालहळळी (अ.), हंजगी, हसापूर, हत्तीकणबस, इब्राहिमपूर, जकापूर, जेऊर, कलहिप्परगे, कर्जाळ, केगाव बु., केगाव खु., मंगरूळ, मिरजगी, मुगळी, नागनहळ्ळी, नागणसूर, नागोरे, नाविदगी, रामपूर/इटगे, सलगर, समर्थनगर-अंबावाडी, संगोगी (आ.), संगोगी (ब.), शावळ, शिरवळ, शिरवळवाडी, सिन्नूर, दुधनी ग्रा., सुलेरजवळगे, तळेवाड, तोळनूर, वसंतराव नाईकनगर, वागदरी या ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. या निधीमधून विहीर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे करण्यात येतील.

कोट :::::::::::

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे प्रस्ताव येत होते. यंदा एकाही गावचा प्रस्ताव आलेला नाही, तरीही प्रशासनाने संभाव्य म्हणून मागील इतिहासाचे अवलोकन करून टंचाई आराखडा तयार करून ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

- शिवाजी चव्हाण,

उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग