शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ऊस गाळपासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:41 IST

पुणे विभागातील ६४ कारखान्यांची मागणी : सहकारी १००; खासगी ९५ कारखान्यांना हवाय परवाना

ठळक मुद्देपुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांच्या अर्जांचा समावेश राज्यात उसाचे क्षेत्रही वाढले राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर इतके

सोलापूर:  दसºयाच्या  सीमोल्लंघनानंतर २० आॅक्टोबर रोजी सुरू होणाºया गाळप हंगामासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाना मागणी केला आहे.  पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांच्या अर्जांचा यामध्ये समावेश आहे. मागील वर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता.

यावर्षीचा साखर हंगाम २० आॅक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने मान्यता दिली आहे. गाळप परवाना मागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज साखर  आयुक्तांकडे करावयाचा होता, या मुदतीत राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षी राज्यात उसाचे क्षेत्रही वाढले आहे. २०१७-१८ च्या गाळप हंगामासाठी राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर इतके होते.

यावर्षीच्या २०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन लाख ६० हजार हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. असे असले तरी यावर्षी हुमणी, पाणीटंचाईचा फटका ऊस क्षेत्राला बसला आहे. असे असले तरी मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक गाळप होईल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. वाढलेले ऊस क्षेत्र पाहता साखर हंगाम सुरू करण्यासाठी यावर्षी साखर कारखान्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. 

 पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख १४ हजार २३३ हेक्टर ऊस असून या विभागातील तब्बल ६४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कोल्हापूर विभागात दोन लाख ३९ हजार १९८ हेक्टर ऊस असून या विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी अर्ज केल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर विभागात एक लाख ४९ हजार ८३१ हेक्टर ऊस आहे, या विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २८ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले आहेत. औरंगाबाद विभागातील २४ कारखान्यांनी गाळप परवाना मागितला असून उसाचे एक लाख ४२ हजार २०० हेक्टर तर नांदेड विभागात एक लाख ९९ हजार ७०३ हेक्टर ऊस क्षेत्र तर ३६ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. नागपूर विभागातील चार व अमरावती विभागातून दोन साखर कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. 

परवान्यासाठी मागणी केलेले कारखानेविभाग        सहकारी    खासगी

  • - अहमदनगर    १६    १२
  • - अमरावती        ००    ०२
  • - औरंगाबाद    १३    ११
  • - कोल्हापूर        २५    १२
  • - नागपूर        ००    ०४
  • - नांदेड        १६    २०
  • - पुणे        ३०    ३४

    एकूण        १००    ९५

थकलेली एफआरपीची रक्कम देणाºया साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाईल. २० आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. एफआरपीमधून कोणाचीही सुटका नाही.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSubhash Deshmukhसुभाष देशमुख