शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

ऊस गाळपासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:41 IST

पुणे विभागातील ६४ कारखान्यांची मागणी : सहकारी १००; खासगी ९५ कारखान्यांना हवाय परवाना

ठळक मुद्देपुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांच्या अर्जांचा समावेश राज्यात उसाचे क्षेत्रही वाढले राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर इतके

सोलापूर:  दसºयाच्या  सीमोल्लंघनानंतर २० आॅक्टोबर रोजी सुरू होणाºया गाळप हंगामासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाना मागणी केला आहे.  पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांच्या अर्जांचा यामध्ये समावेश आहे. मागील वर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता.

यावर्षीचा साखर हंगाम २० आॅक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने मान्यता दिली आहे. गाळप परवाना मागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज साखर  आयुक्तांकडे करावयाचा होता, या मुदतीत राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षी राज्यात उसाचे क्षेत्रही वाढले आहे. २०१७-१८ च्या गाळप हंगामासाठी राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर इतके होते.

यावर्षीच्या २०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन लाख ६० हजार हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. असे असले तरी यावर्षी हुमणी, पाणीटंचाईचा फटका ऊस क्षेत्राला बसला आहे. असे असले तरी मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक गाळप होईल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. वाढलेले ऊस क्षेत्र पाहता साखर हंगाम सुरू करण्यासाठी यावर्षी साखर कारखान्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. 

 पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख १४ हजार २३३ हेक्टर ऊस असून या विभागातील तब्बल ६४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कोल्हापूर विभागात दोन लाख ३९ हजार १९८ हेक्टर ऊस असून या विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी अर्ज केल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर विभागात एक लाख ४९ हजार ८३१ हेक्टर ऊस आहे, या विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २८ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले आहेत. औरंगाबाद विभागातील २४ कारखान्यांनी गाळप परवाना मागितला असून उसाचे एक लाख ४२ हजार २०० हेक्टर तर नांदेड विभागात एक लाख ९९ हजार ७०३ हेक्टर ऊस क्षेत्र तर ३६ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. नागपूर विभागातील चार व अमरावती विभागातून दोन साखर कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. 

परवान्यासाठी मागणी केलेले कारखानेविभाग        सहकारी    खासगी

  • - अहमदनगर    १६    १२
  • - अमरावती        ००    ०२
  • - औरंगाबाद    १३    ११
  • - कोल्हापूर        २५    १२
  • - नागपूर        ००    ०४
  • - नांदेड        १६    २०
  • - पुणे        ३०    ३४

    एकूण        १००    ९५

थकलेली एफआरपीची रक्कम देणाºया साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाईल. २० आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. एफआरपीमधून कोणाचीही सुटका नाही.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSubhash Deshmukhसुभाष देशमुख