शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

ऊस गाळपासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:41 IST

पुणे विभागातील ६४ कारखान्यांची मागणी : सहकारी १००; खासगी ९५ कारखान्यांना हवाय परवाना

ठळक मुद्देपुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांच्या अर्जांचा समावेश राज्यात उसाचे क्षेत्रही वाढले राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर इतके

सोलापूर:  दसºयाच्या  सीमोल्लंघनानंतर २० आॅक्टोबर रोजी सुरू होणाºया गाळप हंगामासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाना मागणी केला आहे.  पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांच्या अर्जांचा यामध्ये समावेश आहे. मागील वर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता.

यावर्षीचा साखर हंगाम २० आॅक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने मान्यता दिली आहे. गाळप परवाना मागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज साखर  आयुक्तांकडे करावयाचा होता, या मुदतीत राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. यावर्षी राज्यात उसाचे क्षेत्रही वाढले आहे. २०१७-१८ च्या गाळप हंगामासाठी राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख २ हजार हेक्टर इतके होते.

यावर्षीच्या २०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन लाख ६० हजार हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. असे असले तरी यावर्षी हुमणी, पाणीटंचाईचा फटका ऊस क्षेत्राला बसला आहे. असे असले तरी मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक गाळप होईल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. वाढलेले ऊस क्षेत्र पाहता साखर हंगाम सुरू करण्यासाठी यावर्षी साखर कारखान्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. 

 पुणे विभागातील पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक ४ लाख १४ हजार २३३ हेक्टर ऊस असून या विभागातील तब्बल ६४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कोल्हापूर विभागात दोन लाख ३९ हजार १९८ हेक्टर ऊस असून या विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी अर्ज केल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर विभागात एक लाख ४९ हजार ८३१ हेक्टर ऊस आहे, या विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील २८ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले आहेत. औरंगाबाद विभागातील २४ कारखान्यांनी गाळप परवाना मागितला असून उसाचे एक लाख ४२ हजार २०० हेक्टर तर नांदेड विभागात एक लाख ९९ हजार ७०३ हेक्टर ऊस क्षेत्र तर ३६ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. नागपूर विभागातील चार व अमरावती विभागातून दोन साखर कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. 

परवान्यासाठी मागणी केलेले कारखानेविभाग        सहकारी    खासगी

  • - अहमदनगर    १६    १२
  • - अमरावती        ००    ०२
  • - औरंगाबाद    १३    ११
  • - कोल्हापूर        २५    १२
  • - नागपूर        ००    ०४
  • - नांदेड        १६    २०
  • - पुणे        ३०    ३४

    एकूण        १००    ९५

थकलेली एफआरपीची रक्कम देणाºया साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाईल. २० आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांचे पैसे चुकते करण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. एफआरपीमधून कोणाचीही सुटका नाही.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSubhash Deshmukhसुभाष देशमुख