शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

भीमा नदीवरचे सातही बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:49 IST

कर्नाटककडे जाणारी वाहने नदीकाठी खोळबली; पूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी

ठळक मुद्देपूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी केली तहसीलकडे एक इंजिन बोट , पाच लाईफ जॅकेट  आणि आठ लाईफ रिंग उपलब्धगरजेनुसार नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याची तयारी

सोलापूर : उजनी धरण आणि नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , भंडारकवठे  ,सादेपूर, औज (म)  आणि चिंचपूर यासह अन्य दोन असे सातही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्यात बुडाले आहेत या पूर स्थितीमुळे कर्नाटकाकडे जाणारी अनेक वाहने नदीकाठीच खोळंबल्याचे चित्र दिसून येते.

 आज सकाळपासून भीमा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे़ सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान वडापूर बंधारा पाण्याखाली गेला त्यामुळे वडापूरहुन सिद्धापूर मंगळवेढाकडे जाणारी वाहने जागेवरच थांबली भंडारकवठे च्या बंधा?्यावर पाणी आल्याने शेतक?्यांची ये जा थांबली. सादेपुर , औज (म) आणि चिंचपूर बंधा?्यावर दुपारी पाणी वाढल्याने कर्नाटककडे जाणारी वाहतूक खोळंबली .रात्री उशिरापर्यंत बंधा?्याजवळ नागरिक पाणीपातळी कमी होण्याची वाट पहात थांबले होते.

दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार रमा जोशी यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या तेथील संभाव्य पूर स्थितीचा आढावा घेतला ग्रामस्थांना रात्री सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पाण्याचा विसर्ग वाढला तर तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले

नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशाराभीमा नदीकाठी असलेली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर , कुसुर , खानापूर,  तेलगाव , भंडारकवठे, लवंगी ,चिंचपूर, बाळगी ,टाकळी, हत्तरसंग ,कुडल, कारकल, कुरघोट ,बोळकवठे , औज (म) या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . या गावात प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे  . टाकळी , सादेपुर येथे पोलीस तर वडापूर येथे जलसंपदा विभागाचे कर्मचारी तैनात आहेत .अन्यत्र महसुलचे मंडल अधिकारी , तलाठी ,कोतवाल यांची दक्षता पथकं सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली .विसर्ग वाढला तर वस्त्यांना धोकासद्यस्थितीत पूरस्थिती नियंत्रणाखाली आहे मात्र रात्री भीमा नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यास कुसुर , खानापूर, तेलगाव आणि लवंगी या नदीलगत असलेल्या गावांना धोका संभवतो. नदीकाठच्या शेतातील वस्त्यांत राहणारे शेतकरी , ग्रामस्थांना अन्यत्र हलवावे लागणार आहे .अशा वस्त्यांची प्रशासनाने पाहणी केली आहे .त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .तशी स्थिती उद्भवली तर त्यांच्या गावातील जुन्या घरात , नातळगांकडे , शाळांमध्ये हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे .आपत्ती व्यवस्थापन सज्जपूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी केली आहे . तहसीलकडे एक इंजिन बोट , पाच लाईफ जॅकेट  आणि आठ लाईफ रिंग उपलब्ध आहेत . गरजेनुसार नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याची तयारी प्रशासनाने केल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले .

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरWaterपाणीwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण