शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आखाडा सोशल मीडियातला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:58 IST

खरं तर आपली राजकीय मते समाजमाध्यमांवर टाकण्याचा आपला अधिकार असला तरी दुसºयांची मतं पचवण्याची परिपक्वता हे समाजमाध्यम वापरताना आली पाहिजे.

परवा एका प्राध्यापक मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. अर्थातच गप्पांच्या ओघात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सुरू असलेल्या निवडणूक उत्सवावर गाडी येऊन थांबली. माझ्या मित्राने त्याच्या एका बºयापैकी मैत्री असलेल्या वरिष्ठ प्राध्यापकाने पाठवलेला मेसेज दाखवला. ‘ प्रिय मित्रा, अलीकडे तू अमूक पक्षाच्या समर्थनार्थ जास्त पोस्ट टाकत असल्यामुळे निवडणूक होईपर्यंत तुला फ्रेंड लिस्टमधून रिमूव्ह करतोय’ असा तो मेसेज होता. 

मला खूप हसू आलं आणि सखेद आश्चर्यही वाटलं़ कारण प्राध्यापक महाशय राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत़ आता राज्यशास्त्राच्या प्राध्यापकासारखी व्यक्ती राजकारण इतके ‘वैयक्तिक’ घेत असेल तर इतर सामान्य लोकांच्या मानसिकतेची कल्पनाच न केलेली बरी. एखादी राजकीय पोस्ट फेसबुक,व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्यावर त्यावर तुमचेच परममित्र विरोधी सूर लावत असतील, त्याची खिल्ली उडवत असतील अशा प्रकारचे ‘ट्रोलिंग’ आपल्यापैकी बºयाच जणांनी अनुभवलं असेल.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातील या मतप्रदर्शनामुळे खºया आयुष्यात मतभेद होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादी व्यक्ती आपले राजकीय विचार व्यक्त करते तर राजकीय मतभेद असणाºया त्याच्या मित्र-मैत्रिणींनी समाजमाध्यमांवर छेडलेल्या वादामुळे प्रत्यक्षातील नाती दुभंगणंही सुरू झाले आहे. त्यातून एकमेकांना ब्लॉक करणं,अनफ्रेंड करणं, विरोधी कमेंट करणं, शेरेबाजी करणं हे सुरू होतं. यातून इतर लोकांचंही फुकट मनोरंजन होतं. एरवी रस्त्यावर एखादं भांडण किंवा अपघात झाला तर जशी बघ्यांची गर्दी जमते तशीच ती गर्दी इथंही जमते आणि ती तशी पसारही होते.

खरं तर आपली राजकीय मते समाजमाध्यमांवर टाकण्याचा आपला अधिकार असला तरी दुसºयांची मतं पचवण्याची परिपक्वता हे समाजमाध्यम वापरताना आली पाहिजे. परिपक्वता नसेल तर असे ‘ट्रोलभैरव’ उच्छाद मांडतात आणि मग सुरु होतो ‘ट्रोलवाट्रोलवी’चा खेळ. यातील जो समंजस, संवेदनशील असतो त्याला ‘आपण आपली मते व्यक्त करावीत की नको, व्यक्त केली तर आपल्याला ट्रोल केले जाईल’ किंवा आपले मित्र आपल्याला अनफ्रेंड करतील, रिलेशन खराब होतील ही भीती सतावत असते. 

नुकताच ‘इपसोस’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात सोशल नेटवर्कवरील राजकीय मतभेदांमुळे नात्यात, मैत्रीत कटुता जगभर वाढीस लागल्याचं हे सर्वेक्षण सांगतं. हे प्रमाण जिथे इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरलं जातं अशा शहरी भागात प्रामुख्याने तरुणांमध्ये जास्त आहे. अगदी दहावी पास झालेल्या तरुणांपासून ते उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा राजकीय मतं ‘पर्सनली’ घेतात़ निवडणुका येतील, जातील, एखादा पक्ष जिंकेल किंवा हरेल पण म्हणून आपल्याच मित्रांच्या गोतावळ्यात वितुष्ट आणणं हे निरोगी नात्यांचं लक्षण नाहीये.यावर उपाय काय?

रागाच्या भरात काही जण अनफ्रेंड/ब्लॉक करतात. काहीजण नाती तोडतात,परंतु हा काही उपाय होऊ शकत नाही. काहीजण याला तितक्याच खोचकपणे,तिरकसपणे उत्तर देतात. याला ‘सोशल नेटवर्किंग’च्या दुनियेत उपहासात्मक पद्धतीने तोडीस तोड उत्तर देऊन समोरच्याला शांत करणे तेही संयमीपणे शब्द वापरून. आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्या पोस्टवर विरोधी कमेंट आली तरी त्याला वाचून सोडून देणे त्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका न घेणे. पण मित्रांनो खरंच या सर्वांची गरज आहे का? लोकशाहीने बहाल केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा वापर समाजमाध्यमांवर करताना नक्कीच भान बाळगले पाहिजे़ सोशल नेटवर्किंगवर ‘सोसंल’ एवढंच बोललं आणि वाचलं पाहिजे. यातून वाद टाळून संवादाचा मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी आभासी जगातील वाद-विवाद,मतभेद आपल्या सुंदर नात्यांमध्ये काटे तर बनत नाहीयेत ना एवढा विचार केला तरी पुरेसे आहे. - प्रा. रवींद्र देशमुख(लेखक हे कम्युनिकेशन स्किल्स अभ्यासक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरWhatsAppव्हॉटसअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल