शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अवघ्या २४ व्या वर्षी आयेशा बनली न्यायाधीश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:40 IST

तोळणूरसह अक्कलकोटमध्ये आनंदोत्सव; आयेशा यांनी परिस्थिती अन् संकटावर केली मात

ठळक मुद्देअक्कलकोटपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावरील तोळणूर गावकर्नाटक सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गावात भाषेची अडचणजिद्द न सोडता आयेशा यांनी सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला

बऱ्हाणपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तोळणूर (ता. अक्कलकोट) या छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या कन्येने यश मिळविले. आयेशा पिरजादे असे त्या कन्येचे नाव. आयेशा या अवघ्या २४ वर्षांच्या आहेत. 

अक्कलकोटपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावरील तोळणूर गाव़ कर्नाटक सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गावात भाषेची अडचण. गावात फक्त १० वी पर्यंतच शिक्षणाची सोय. त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं; मात्र जिद्द न सोडता आयेशा यांनी सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षे विधीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. राज्यभरातून १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. अंतिम यादीत केवळ १९० विद्यार्थ्यांची परीक्षा झाली़ त्यात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.

आयेशा पिरजादे यांचे वडील अजीजपाशा पिरजादे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गावात असलेली शेती हेच अर्थार्जनाचे साधन. त्यांना पाच मुली आहेत; मात्र परिस्थिती समाधानकारक नसतानाही त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले नाही. पाचपैकी चार मुली या उच्चशिक्षित आहेत. त्यांची पाचवी मुलगी शिक्षण घेत आहे. सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीतही उत्पन्न मिळत नाही. कुटुंबाची बिकट परिस्थिती असतानाही मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही.

याच परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आयेशा यांनादेखील शिकवले. या कष्टाचं फलित झालं. या यशानंतर संपूर्ण परिवार आनंदात असल्याचे दिसून आले. आयेशा यांच्या यशाने नातेवाईकांसह ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.

मुस्लीम परिवारामध्ये सहसा मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केलं जात नाही; मात्र वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले आहे. - आयेशा पिरजादे

मुलींना दुय्यम स्थानी समजणाऱ्या लोकांसाठी हे यश दिशा देणारे आहे. पाच मुली असतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने हे यश दिसत आहे. फक्त कुटुंबातीलच नाही तर गावातील पहिली न्यायाधीश मुलगी झाल्याने अतिशय आनंदी आहे.  

- अजीजपाशा पिरजादे, वडील

मुलगी असूनही आयेशा यांनी गावचे नाव रोशन केले. कमी वयात न्यायाधीश होऊन तालुक्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी दाखवून दिली. कमी शेती असतानाही मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या अजीजपाशा पिरजादे यांचे अभिनंदऩ मुली सक्षम झाल्या तरच राष्ट्राची प्रगती होईल़- सचिन कल्याणशेट्टी, आमदार

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयadvocateवकिलMPSC examएमपीएससी परीक्षा