शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

शेतीचं सोडा, आम्हाला प्यायलाबी पाणी नाय; केंद्रीय दुष्काळ पथकासमोर शेतकºयांनी मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:55 IST

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात ...

ठळक मुद्दे खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीतजनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली

मंगळवेढा : सततच्या दुष्काळाने येथील शेतकरी पूर्णपणे खचला आहे, खरीप-रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, चाºयाअभावी जनावरे कत्तलखान्याला जात आहेत़ लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बागा पाण्याअभावी जळून जात आहेत, शेती व्यवसाय धोक्यात आला आहे़ साहेब़़़ शेतीचे सोडा, प्यायलाबी पाणी मिळेनासे झाले आहे, अशी व्यथा शेतकºयांनी केंद्रीय समितीच्या पथकासमोर मांडली.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आंधळगाव येथे पोहोचले. दुष्काळी समिती पथकाच्या अहवालानुसार सरकारी मदत मिळणार म्हणून अनेक शेतकरी सकाळी ७ वाजल्यापासून रस्त्याकडे टक लावून बसले होते़पथकाने आंधळगाव येथे सीताराम वेळापुरे यांच्या खरिपातील जळालेल्या भुईमूग, ज्वारी या पिकांची पाहणी केली़ खरीप जळून गेले, रब्बी पेरणी झाली नाही़ शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय चारा व पाण्याअभावी कोलमडला आहे़ पुढील पावसाळा येईपर्यंत पशुधन जगणे मुश्कील आहे, अशी व्यथा शेतकरी वेळापुरे यांनी पथक प्रमुखाकडे मांडली.

 केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख सुभाषचंद्र मीना, सदस्य एम. जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी सर्व शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, पं स. सभापती प्रदीप खांडेकर, प्रा़ शिवाजीराव काळुंगे, प्रा़ येताळा भगत, झेडपी सदस्या शैला गोडसे, तालुका कृषी अधिकारी नामदेवराव गायकवाड, शिवाजीराव नागणे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते़

पथकप्रमुखांनी प्रश्नोत्तरासह घेतली नोंद- पथकप्रमुख मीना यांनी आंधळगाव येथे पाहणी करताना प्रश्नोत्तरासह मुद्दे नोंदविले़ खरिपाची पिके पूर्णपणे संपुष्टात आली आहेत़ पाण्याअभावी फळबागा, दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे जनावरांना चारा व पिण्याचे पाणी देण्याबाबत शेतकºयांची मागणी आहे. रोजगार हमी योजना, शेततळी, जलयुक्त शिवार योजना याबाबतही माहिती नोंदवली आहे. दरम्यान, शेतकºयांनी मांडलेल्या व्यथा अत्यंत भीषण आहेत़ शासनस्तरावर ही माहिती पोहोचवू शेतकºयांप्रति आपण अत्यंत संवेदनशील आहोत, असे केंद्रीय पथकातील सदस्यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार