शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आक्रमक तरुणांपुढे रुग्णालय प्रशासन नमले, बंद केलेली 'आरोग्य योजना पुन्हा सुरू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 22:06 IST

शहरातील जगदाळेमामा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद करण्यात आली असे सांगून रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना या सेवेपासून वंचित ठेवले होते.

बार्शी - शहरातील जगदाळेमामा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद करण्यात आली असे सांगून रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना या सेवेपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे रुग्णालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिब रुग्णांना जनआरोग्य सेवेचा लाभ मिळत नव्हता. मात्र, शहरातील नवयुवकांच्या संघटनांनी क्रांती पाऊल उचलत रुग्णालयत प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर, लगेचच रुग्णालय प्रशासनाने ही सेवा सुरू केल्याचे सांगत प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना सुविधा देण्यास प्रारंभ केला. 

बार्शीतील कर्मवारी मामासाहेब जगदाळे रुग्णालय हे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील प्रशासनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील प्रशासकीय विभागाकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. शुक्रवारीही तसाच प्रत्यय येथील प्रविण थळकरी या तरुणास आला. प्रविणचे नातेवाईक जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल होते, त्यामुळे त्यानां भेटण्यासाठी प्रविण गेला होता. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून रुग्णालयाने महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद केली आहे, असे सांगितले. मात्र, शासन स्तरावर ही योजना सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने स्वयंघोषित हा निर्णय लागू केला होता. केवळ ही योजना बंद करण्यासाठी रुग्णालयाने शासन स्तरावर 3 महिन्यांपूर्वी पत्र दिले होते. मात्र, अद्याप शासनाकडून ही योजना बंद करण्याबाबत कुठलिही सूचना देण्यात आली नव्हती. तरीही, रुग्णालय प्रशासनाने योजना बंद झाल्याचे सांगत रुग्णांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुग्णांना या योजनेपासून वंचित राहावे लागले असून मनस्तापही सहन करावा लागला. 

भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष विक्रांत पवार, शिवक्रांती प्रतिष्ठानचे शिरीष ताटे, प्रहार संघटनेचे मंगेश मुलगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवशंकर ढवन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रमसिंह पवार, संदीप नागने, प्रदीप नवले, प्रवीण थळकरी, अजय पाटिल यांनी अतिशय आक्रमकपणे मुद्दा लावून धरला. तसेच या योजनेपासून तुम्ही नागरिकांना वंचित ठेवू शकत नाही, असे संबंधित अधिकारी डॉ. जगताप यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर, नियमातील त्रुटी आणि आपण बंद करण्याच्या निर्णय घेवू शकत नाहीत असे लक्षात येताच शासन निर्णय येईपर्यंत सर्व रुग्णांना सदर योजनेचे लाभ घेता येईल, असा निर्णय रुग्णालया प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे रुग्णालयातील जवळपास 50 रुग्णांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, रुग्णालय प्रशासनाचा अनगोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नगरपालिका आरोग्य विभाग आणि तहसिलदार या रुग्णलयातील प्रशासनाला याचा जाब विचारणार का हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल