शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आक्रमक तरुणांपुढे रुग्णालय प्रशासन नमले, बंद केलेली 'आरोग्य योजना पुन्हा सुरू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 22:06 IST

शहरातील जगदाळेमामा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद करण्यात आली असे सांगून रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना या सेवेपासून वंचित ठेवले होते.

बार्शी - शहरातील जगदाळेमामा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद करण्यात आली असे सांगून रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना या सेवेपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे रुग्णालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिब रुग्णांना जनआरोग्य सेवेचा लाभ मिळत नव्हता. मात्र, शहरातील नवयुवकांच्या संघटनांनी क्रांती पाऊल उचलत रुग्णालयत प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर, लगेचच रुग्णालय प्रशासनाने ही सेवा सुरू केल्याचे सांगत प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना सुविधा देण्यास प्रारंभ केला. 

बार्शीतील कर्मवारी मामासाहेब जगदाळे रुग्णालय हे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हक्काचे ठिकाण आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील प्रशासनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील प्रशासकीय विभागाकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. शुक्रवारीही तसाच प्रत्यय येथील प्रविण थळकरी या तरुणास आला. प्रविणचे नातेवाईक जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल होते, त्यामुळे त्यानां भेटण्यासाठी प्रविण गेला होता. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून रुग्णालयाने महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद केली आहे, असे सांगितले. मात्र, शासन स्तरावर ही योजना सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने स्वयंघोषित हा निर्णय लागू केला होता. केवळ ही योजना बंद करण्यासाठी रुग्णालयाने शासन स्तरावर 3 महिन्यांपूर्वी पत्र दिले होते. मात्र, अद्याप शासनाकडून ही योजना बंद करण्याबाबत कुठलिही सूचना देण्यात आली नव्हती. तरीही, रुग्णालय प्रशासनाने योजना बंद झाल्याचे सांगत रुग्णांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रुग्णांना या योजनेपासून वंचित राहावे लागले असून मनस्तापही सहन करावा लागला. 

भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष विक्रांत पवार, शिवक्रांती प्रतिष्ठानचे शिरीष ताटे, प्रहार संघटनेचे मंगेश मुलगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवशंकर ढवन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रमसिंह पवार, संदीप नागने, प्रदीप नवले, प्रवीण थळकरी, अजय पाटिल यांनी अतिशय आक्रमकपणे मुद्दा लावून धरला. तसेच या योजनेपासून तुम्ही नागरिकांना वंचित ठेवू शकत नाही, असे संबंधित अधिकारी डॉ. जगताप यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर, नियमातील त्रुटी आणि आपण बंद करण्याच्या निर्णय घेवू शकत नाहीत असे लक्षात येताच शासन निर्णय येईपर्यंत सर्व रुग्णांना सदर योजनेचे लाभ घेता येईल, असा निर्णय रुग्णालया प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे रुग्णालयातील जवळपास 50 रुग्णांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, रुग्णालय प्रशासनाचा अनगोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नगरपालिका आरोग्य विभाग आणि तहसिलदार या रुग्णलयातील प्रशासनाला याचा जाब विचारणार का हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल