शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

निसर्गाच्या अवकृपेला वैतागून शेतकºयाने सोळाशे झाडांची अ‍ॅपल बोरची बाग तोडून काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:52 IST

अय्युबखान शेख माढा : केवड येथील महारुद्र विश्वनाथ चव्हाण व गणेश महारुद्र चव्हाण या अ‍ॅपल बोर उत्पादक शेतकºयांनी निसर्गाच्या ...

ठळक मुद्देपाचवीला पुजलेला दुष्काळ, बदललेल्या वातावरणाचा जिल्ह्यातील बागांना फटका उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असताना निसर्गाने बदललेल्या वातावरणाचा फटका दिला

अय्युबखान शेख

माढा : केवड येथील महारुद्र विश्वनाथ चव्हाण व गणेश महारुद्र चव्हाण या अ‍ॅपल बोर उत्पादक शेतकºयांनी निसर्गाच्या अवकृपेला वैतागून सोळाशे झाडांची ही बागच तोडून काढली.

माढा तालुक्यातील सीना नदीलगतच असणाºया केवड या गावातील विहीर आणि बोअरवेलला पाणी टिकत नसल्याने या दोन्ही भावांनी ऊसशेतीमध्ये ऊस न लावता २०१४ मध्ये शेतीतील पाच एकरांत अ‍ॅपल बोरीची बाग लावली होती. बँकेचे कर्ज घेऊन बाग जोपासली. संपूर्ण बागेला ठिबक करून सेंद्रिय खताचा वापर केला. दहा ते बारा टन एकरी उत्पन्न घेतले. एका वर्षी तर साठ टनाचे विक्रमी उत्पन्न घेतले. सोलापूरसह नाशिक, नांदेड, गुजरात, ओरिसा या ठिकाणी बोरं विक्रीला जायची. परिसरातील शेतकरी अ‍ॅपल बोरासाठी या शेतकºयांचे मार्गदर्शन घेत असत.

उत्पादन आणि गुणवत्ता लक्षात घेऊन अ‍ॅपल बोर निर्यात करण्याचा त्यांचा मानस होता. अ‍ॅपल बोरचा किमयागार असा पुरस्कारही या शेतकºयाला मिळाला होता. पहिल्या वर्षी २५ लाख, दुसºया वर्षी १५लाख तर तिसºया वर्षी १० लाख उत्पन्न मिळाले. यावर्षी उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असताना निसर्गाने बदललेल्या वातावरणाचा फटका दिला. बदललेल्या वातावरणामुळे फळांत कीड पडली. यामुळे बाजारपेठेत दर घटला. बँकेच्या कर्जाचे हप्ते भरणेही यंदा कठीण झाल्याचे लक्षात आल्याने व भविष्यातही अशीच स्थिती राहिली तर कर्जाचा बोझा पुन्हा वाढण्याच्या शक्यतेने या शेतकºयाने शेतातील सर्वच अ‍ॅपर बोरची झाडे कापून काढली. 

एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पडलेला भाव. यामुळे शेतकरी पार हादरून गेला आहे. अ‍ॅपल बोरपासून भरपूर उत्पन्न मिळाले. पण यंदा पावसाअभावी बाग काढण्याची वेळ आली. पण बाग काढताना फार वाईट वाटत आहे.-गणेश चव्हाण, बोर उत्पादक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ