शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

लॉकडाऊन काळातील दुपार अन् जुन्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:02 IST

नातीच संपत चाललीत तिथे आठवणींची काय किंमत ?

लॉकडाऊनच्या काळात सकाळ आणि संध्याकाळ कामाच्या ओघात जाते; मात्र दुपार काही केल्या सरत नाही. ती उरावर बसते आणि आपली उलघाल होत राहते. अशावेळी जुन्या काळातली दुपार हटकून आठवत राहते. कारण तेव्हाची ती दुपारची निवांत वेळही तशीच होती, मेंदूचा यंत्रवत ताबा घेणारी तरीही मंत्रमुग्ध करणारी. तेव्हा चिमण्यादेखील चिवचिव करून थकलेल्या असत, परसदारात आई डोईवर पदर घेऊन काहीतरी काम करत असायची. झाडांच्या फांद्या एकमेकींच्या गळ्यात हात घालून सुस्त होऊन गेलेल्या असत. पानगळसुद्धा दुपारी होत नसे. पाने, फुले सगळी कशी आरामात मान वेळावून बसत ! झाडावरल्या घरट्यात देखील सामसूम असे, पाखरांना खाऊ आणायला गेलेले पक्षी अजून घरट्यात परतलेले नसत. त्यांची वाट बघत ती इवलीशी पाखरे आपली चोच उघडी टाकून तशीच पेंगुळलेली असत !

जेवणे आटोपून आपल्या तान्हुल्याबरोबर खेळणाºया आईचा काय तो नाजूक आवाज संगतीला असे, गल्लीच्या एखाद्या कोपºयात सकाळच्या शाळेतून आलेल्या पोरांनी लगोरीचा उनाड डाव मांडलेला असायचा अन् त्याचा मधूनच येणारा आवाजाचा गलका दुपारचा सर्वात मोठा आवाज असे. घरा-घरातल्या पोक्त बायकांनी पदराचा कोपरा ओठात पकडत माजघरातल्या चोरट्या आवाजातल्या गप्पांची बैठक बसवलेली असे. शेजारी कुठेतरी वाळवणातल्या वस्तू वरखाली करायचे काम चालू असे. आसपासच्या एखाद्या घरातून एखाद्या मुलाचा अभ्यास घेतानाचा एकसुरी आवाज येत असे.

रस्त्याच्या वरच्या कोपºयात असलेल्या हापशावर अधूनमधून कोणी पाणी भरायला आले तर त्याचा हापसा मारण्याचा कडाक कडाक आवाज मात्र शांती भंग करत असे. दूर कोठून तरी ऐकू येणारा एखादा वाहनाचा आवाज एवढाच काय तो मोठा व्यत्यय. सगळ्या इमारती आपल्या मुक्या सावल्यात मश्गुल  होऊन गेलेल्या असत. इमारतींच्या आडोशाला, जिन्याखाली भटक्या कुत्र्यांनी मस्तपैकी अंगाचे वेटोळे करून ताणून दिलेली असे. एखाद दुसरा सायकलवाला अवखळ पोरगा ट्रिंग ट्रिंग आवाज करत जायचा त्याचा आवाज देखील मोठा वाटायचा. सगळ्या आसमंतात एक अनामिक शिथिलता आलेली असे, निळ्याशार आकाशातले ढगदेखील एकाच जागी हट्टी मुलासारखे नुसते बसून राहत ! हवाच काय ती शीतल झुळका घेऊन शांत एका लयीत उनाडक्या करत फिरत असे. हवेच्या त्या मंद झुळका खिडकीतून थेट घरभर फेर धरत. हवेच्या झुळका जशा बदलायच्या तशी टवटवीत अवीट गोडीची गाणी एकामागून एक कानावर येत राहत, थोडी खट्टी थोडी मिठी अशी चव असणारी ही गाणी कधी कधी एखाद्या दुपारी उगाच उदास करून जात तेव्हा मात्र दुपार कधी टळून जाते असं वाटायचे ! मात्र  बहुतांशी हा रेडिओवरच्या फर्माईशी गाण्याचा कार्यक्रम त्यातल्या निवेदिकेच्या आवाजाइतका गोष्टीवेल्हाळ अन् मधाळ असायचा. त्यावर माझा इतका जीव जडलेला की आता कधी कधी नुसत्या आठवणींचे आभाळ दाटले की डोळे ओले व्हायला वेळ लागत नाही. 

त्या मंतरलेल्या दुपारच्या काळात नुकतंच जेवण आटोपून वामकुक्षी करणारे बाबा हळूच निद्रादेवीच्या अधीन झालेले बघताना गंमत वाटायची. तेव्हा भर दुपारचा सूर्य देखील फारसा छळत नसे, त्याची किरणे रेडिओवरची गाणी संपत जायची तशी दिशा बदलून घराच्या या कोपºयातून सुरु होऊन त्या कोपºयात विश्रांती घेत. कवडसे आपल्याच नादात उजेडाचा खेळ घरभर झिम्मा खेळत. फार शांत होते ते दिवस अन् फार सुखी होते ते जीवन. कोठलीही रिंगटोन नव्हती की कुठला टीव्ही नव्हता. साधी सोपी पण निखालस हृदयात उतरत जाणारी निखळ करमणूक करणारी ती शांत अशी दुपार नजरेआडून जातच नाही. दिवसभराची शाळा सुटल्यानंतर घरी येणारी मुलेच काय ती संध्याकाळ होत आल्याची खूण असायची. तोपर्यंत रेडिओवरची ती गाणी हातात हात गुंफून सोबतीला राहायची. गारगोटीतून निघणाºया ठिणग्या जशा हळूहळू क्षीण होत जातात तसे या दुपारच्या आठवणींचे झालेय. तशा तप्त ठिणग्याची आता ओढ नाही पण त्या गारगोट्या तशाच अजून दिवाणखाण्यातल्या कपाटात मखमली कापडात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या सुरेख आठवणी अनेक असतील पण निवांत अन् अस्ताव्यस्त पहुडलेल्या अंगावर मायेची रजई घेऊन आपल्याला गुरफटून टाकणाºया त्या दुपारच्या आठवणींनी नकळत डोळे ओले होतात.

आताच्या या कृत्रिम जगात सारीच दिनचर्या बेगडी झालीय, काय जगतोय आणि का जगतोय याचाच शोध घेत स्वत:ला अजूनही शोधतो आहे. एकेकाळी मामा, मामी, काका, काकी, आत्या, आजोबा, आजी,  मावशी, दादा, ताई ही नाती सर्वांच्या वाट्याला असत. काही ठिकाणी आता यातील ताई आणि दादाच राहिलेत तेही नावापुरते. नातीच संपत चाललीत तिथे आठवणींची काय किंमत ? रसाळ आठवणींचा हा झरा अनेकांच्या जगण्याचे स्फूर्तीस्रोत बनून गेला असेल तर त्यात नवल ते काय !- समीर गायकवाड,(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस