शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूर जिल्ह्यात आठ टँकर अन् पाच छावण्या तातडीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 20:52 IST

निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती : दोन दिवसात केली उपाययोजना

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता.मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. या उपक्रमात तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते. 

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, पाणीच मिळत नसल्याची तक्रार यावेळी काही महिला सरपंचांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गावात तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी संबंधित विभागास मागणी आलेल्या ठिकाणी तातडीने प्रस्ताव सादर करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार टंचाई असणाºया गावात ६ खासगी बोअरवेलही ताब्यात घेण्यात आले आहेत. या माध्यमातूनही टंचाई गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांकडून आलेल्या मागणीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

सोमवारपर्यंत मागणी आलेल्या गावांची पाहणी करण्यात आली. मंगळवारी मागणी आलेल्या सर्व ठिकाणी टँकर, छावण्या देण्याची व्यवस्था करण्यात आली. 

पीकविमा योजनेचा अहवाल अप्राप्तच्पीकविमा योजनेत शेतकºयांना मदत देताना दुजाभाव करण्यात आला असल्याची तक्रार एका सरपंचाने मुख्यमंत्री यांच्याकडे संवादादरम्यान केली होती. काही शेतकºयांना तीन हजार तर काही शेतकºयांना त्याच पिकासाठी तिवढ्याच क्षेत्रासाठी तीस हजारांपर्यंत मदत देण्यात आल्याची बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते, मात्र हा अहवाल आपल्याकडे आला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय