शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उन्हाळी पिकांना फायदा;  उजनी कालव्यातून रब्बी पिकांसाठी पाणी सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:32 IST

भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही ...

ठळक मुद्देसुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार

भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याला सोडण्यात येणार आहे. सुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे.

सुरुवातीला दोन जानेवारीला सुटणारी पाळी नंतर २० जानेवारीला ठरली, परंतु पाणी मागणीस उठावच नसल्याने सुमारे एक महिनाभर पाणीपाळी पुढे ढकलण्यात आली. कालवा सल्लागार समितीने मिटिंग घेऊन २० फेब्रुवारीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा मात्र ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या पिकांना होणार असून, यामुळे धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार आहे. 

उजनी धरण व्यवस्थापन विभागाने उशिरा का होईना पाणी काटकसर केल्यामुळे येणाºया काळात याचा फायदा दिसून येणार आहे.उजनी धरणातील पाणीसाठा २०.४२ टक्के असून, उपयुक्त १०.९४ टीएमसी आहे. त्यामुळे आता येणाºया महिनाभरात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल व तिथून पुढे पाणी मात्र काटकसरीने वापरावे लागेल. आजच्या स्थितीला दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, बोगदा या सर्वांसाठी पाणी सुरू असून, थोड्याच दिवसात नदीला पाणी सोडण्यात येईल म्हणजेच झपाट्याने पाणी कमी होणार हे मात्र नक्की आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी ७७.३८ टक्के होती.

उजनीची आजची स्थिती

  • - एकूण पाणीपातळी: ४९२.४९५ मीटर
  • - एकूण पाणीसाठा :२११२.६७ दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा : ३०९.८५ दलघमी
  • - टक्केवारी: २०.४२
  • - एकूण: ७४.६० टीएमसी
  • - उपयुक्त : १०.९४ टीएमसी
  • - बोगदा: ९०० क्युसेक
  • - सीना-माढा उपसा: २८० क्युसेक
  • - दहिगाव उपसा: ९० क्युसेक
  • - कालवा: ५०० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी