शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

उन्हाळी पिकांना फायदा;  उजनी कालव्यातून रब्बी पिकांसाठी पाणी सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:32 IST

भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही ...

ठळक मुद्देसुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार

भीमानगर: उजनी धरणातून कालव्याला रब्बी हंगामासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याला सोडण्यात येणार आहे. सुरूवातीला २०० क्युसेक व नंतर ५०० क्युसेक व येत्या दोन दिवसांत २८०० ते ३००० क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे.

सुरुवातीला दोन जानेवारीला सुटणारी पाळी नंतर २० जानेवारीला ठरली, परंतु पाणी मागणीस उठावच नसल्याने सुमारे एक महिनाभर पाणीपाळी पुढे ढकलण्यात आली. कालवा सल्लागार समितीने मिटिंग घेऊन २० फेब्रुवारीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा मात्र ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या पिकांना होणार असून, यामुळे धरणातील पाणीसाठाही स्थिर राहिला आणि हेच पाणी आता एप्रिल, मे व जून या महिन्यांत उपयोगी येणार आहे. 

उजनी धरण व्यवस्थापन विभागाने उशिरा का होईना पाणी काटकसर केल्यामुळे येणाºया काळात याचा फायदा दिसून येणार आहे.उजनी धरणातील पाणीसाठा २०.४२ टक्के असून, उपयुक्त १०.९४ टीएमसी आहे. त्यामुळे आता येणाºया महिनाभरात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल व तिथून पुढे पाणी मात्र काटकसरीने वापरावे लागेल. आजच्या स्थितीला दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, बोगदा या सर्वांसाठी पाणी सुरू असून, थोड्याच दिवसात नदीला पाणी सोडण्यात येईल म्हणजेच झपाट्याने पाणी कमी होणार हे मात्र नक्की आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी ७७.३८ टक्के होती.

उजनीची आजची स्थिती

  • - एकूण पाणीपातळी: ४९२.४९५ मीटर
  • - एकूण पाणीसाठा :२११२.६७ दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा : ३०९.८५ दलघमी
  • - टक्केवारी: २०.४२
  • - एकूण: ७४.६० टीएमसी
  • - उपयुक्त : १०.९४ टीएमसी
  • - बोगदा: ९०० क्युसेक
  • - सीना-माढा उपसा: २८० क्युसेक
  • - दहिगाव उपसा: ९० क्युसेक
  • - कालवा: ५०० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी