शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

उजनीतून शेतकरी नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:23 AM

कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे ...

कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे जिल्ह्यातील इंदापूरला वळविण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. या पाणीचोरीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी घेण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन उजनी जलाशयात उड्या मारल्या. पालकमंत्र्यांबरोबर बैठक लावा आणि तसे लेखीपत्र द्या, असा आक्रमक पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतल्याने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्र पाठवून ७ मे रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची नियोजन भवन, सोलापूर येथे बैठक लावली असल्याचे लेखी दिले. मात्र ही नियोजित बैठक लांबवून शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पाण्याच्या बाहेर काढण्याचे प्रशासनाचे डावपेच यशस्वी झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय जलसंपदा विभागामार्फत घेतला आहे. यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यावर गदा येईल म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याचा उद्रेक म्हणून उजनी जलाशयात पालकमंत्री भरणे यांचा पुतळा बुडविला.

दरम्यान, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. १ मे रोजी शेतकरी नेत्यांनी जलाशयात उड्या मारल्या. आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी पत्रावर ठाम होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी या पाणीप्रश्नावर बैठक लावली असल्याचे सांगून संघटनेची बोळवण केली. दरम्यान, ७ मे रोजीच्या बैठकीप्रश्नी ६ मे रोजी चौकशी केली असता नियोजित बैठक रद्द झाली असून, तहसीलदारांना याबाबत कळविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र ज्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलने केले, त्यांना गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत बैठक रद्द करण्यात आल्याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. म्हणजे त्यादिवशी केवळ आंदोलकांना उजनी जलाशयातून बाहेर काढण्यासाठीच ते पत्र दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे.

पालकमंत्री व जलसंपदा विभागाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही हा निर्णय बद्दलल्यावरच आंदोलन थांबवू, असे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माउली हळणवर यांनी सांगितले.

-----

..तर तीव्र पडसाद उमटतील

आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून बारामतीकरांनी टाकलेला हा डाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच बैठकीला येणे सोईचे असताना जाणीवपूर्वक बैठक पुणे येथे ठेवण्यात आली आहे. ही नियोजित बैठक लांबवणे म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा आहे. आता सोमवारी ठरल्याप्रमाणे पुणे येथे उद्याची बैठक न झाल्यास याचे सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.