शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

अबब... सोलापूरचा कोरोना मृत्यूदर १०.०९ टक्के; ४६ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:17 IST

राज्यात सर्वाधिक :  पहिल्या क्रमांकावरील जळगावचा ११.५३ टक्के तर अमरावती तिसºया स्थानी

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाहीआजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत

महेश कुलकर्णी 

सोलापूर : कोरोनाने महाराष्टÑातील सर्वच भागात हातपाय पसरलेले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार होत असला तरी मृत्यूदर हा साधारण २ ते ३ टक्क्यांपर्यंत असेल, असे जगभरातील तज्ज्ञ सांगत असले तरी महाराष्टÑातील जळगाव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा मृत्यूदर अनुक्रमे ११.५३% आणि १०.०९% झालेला आहे.

जळगाव हा महाराष्टÑातील सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा ठरला आहे तर दुसºया क्रमांकावर सोलापूर आहे. याखालोखाल तिसरा क्रमांक अमरावतीचा आहे. अमरावती जिल्ह्यात मृत्यूदर ७.६९% इतका आहे. 

महाराष्टÑात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती ही शहरे रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे अधिक मृत्यू झाले आहेत तर सोलापूर शहरात हे प्रमाण अधिक आहे.

मृत्यूदर वाढण्याची चार प्रमुख कारणे...

  • - कोरोनाची लक्षणे अनेक दिवस दिसल्यावरही तपासणी न करणे.
  • - खासगी रुग्णालयात न मिळणारे उपचार
  • - अपुरी वैद्यकीय सेवा. 
  • - केवळ सरकारी सेवेवर अवलंबून असणे आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव.
  • - फिजिकल डिस्टन्स न पाळणे

जळगावमध्ये ५६ दिवसांत ५४; सोलापुरात ४६ दिवसांत ६३ मृत्यू- जळगावमध्ये कोरोनाच्या ५६ दिवसांत कोरोनाचे ५४ मृत्यू झाले आहेत, तर सोलापुरात १२ एप्रिल रोजी पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तोही रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे मृत्यूनंतरच कळले! सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत.

देशाचा २.९८% तर राज्याचा मृत्यूदर ३.२१%- देशात कोरोनाचा मत्यूदर हा २.९८% इतका आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ महाराष्टÑात होत आहे. सध्या दर दिवशी तीन हजारांच्या आसपास नवे पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळत आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.२१% एवढा आहे.

सोलापुरात मृत्यूनंतरच कळतो कोरोना !- सोलापुरात कोरोनाच्या रुग्णांचा सतत वाढता आलेख आहे. एवढे होऊनही सोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाही. एखाद्या आजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सातत्याने दिसतो आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव