शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अबब... सोलापूरचा कोरोना मृत्यूदर १०.०९ टक्के; ४६ दिवसांत ६३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:17 IST

राज्यात सर्वाधिक :  पहिल्या क्रमांकावरील जळगावचा ११.५३ टक्के तर अमरावती तिसºया स्थानी

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाहीआजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत

महेश कुलकर्णी 

सोलापूर : कोरोनाने महाराष्टÑातील सर्वच भागात हातपाय पसरलेले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार होत असला तरी मृत्यूदर हा साधारण २ ते ३ टक्क्यांपर्यंत असेल, असे जगभरातील तज्ज्ञ सांगत असले तरी महाराष्टÑातील जळगाव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा मृत्यूदर अनुक्रमे ११.५३% आणि १०.०९% झालेला आहे.

जळगाव हा महाराष्टÑातील सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा ठरला आहे तर दुसºया क्रमांकावर सोलापूर आहे. याखालोखाल तिसरा क्रमांक अमरावतीचा आहे. अमरावती जिल्ह्यात मृत्यूदर ७.६९% इतका आहे. 

महाराष्टÑात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती ही शहरे रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे अधिक मृत्यू झाले आहेत तर सोलापूर शहरात हे प्रमाण अधिक आहे.

मृत्यूदर वाढण्याची चार प्रमुख कारणे...

  • - कोरोनाची लक्षणे अनेक दिवस दिसल्यावरही तपासणी न करणे.
  • - खासगी रुग्णालयात न मिळणारे उपचार
  • - अपुरी वैद्यकीय सेवा. 
  • - केवळ सरकारी सेवेवर अवलंबून असणे आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव.
  • - फिजिकल डिस्टन्स न पाळणे

जळगावमध्ये ५६ दिवसांत ५४; सोलापुरात ४६ दिवसांत ६३ मृत्यू- जळगावमध्ये कोरोनाच्या ५६ दिवसांत कोरोनाचे ५४ मृत्यू झाले आहेत, तर सोलापुरात १२ एप्रिल रोजी पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तोही रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे मृत्यूनंतरच कळले! सोलापुरात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून, ४६ दिवसांत ५९ मृत्यू कोरोनाने झाले आहेत.

देशाचा २.९८% तर राज्याचा मृत्यूदर ३.२१%- देशात कोरोनाचा मत्यूदर हा २.९८% इतका आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ महाराष्टÑात होत आहे. सध्या दर दिवशी तीन हजारांच्या आसपास नवे पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळत आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.२१% एवढा आहे.

सोलापुरात मृत्यूनंतरच कळतो कोरोना !- सोलापुरात कोरोनाच्या रुग्णांचा सतत वाढता आलेख आहे. एवढे होऊनही सोलापुरात कोरोना नेमका आला कसा ? हे कोडे प्रशासनाला अद्याप उलगडले नाही. एखाद्या आजारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर येते, असा गंमतीशीर पण तितकाच गंभीर प्रकार सोलापुरात सातत्याने दिसतो आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव