शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक घटना; दोन भावंडांसह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 22:18 IST

करकंब येथील दुर्दैवी घटना : गावावर शोककळा पसरली

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात करकंब येथील मोडनिंब रोडलगत परदेशी यांच्या शेतातील तळ्यामध्ये पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतामध्ये सख्ख्या भावंडांचा मृत्यू आहे. ही घटना शनिवारी, १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मनोज अंकूश पवार (वय ११), गणेश नितीन मुरकुंडे (वय ७), हर्षवर्धन नितीन मुरकुंडे (वय ९) अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी करकंब शहरालगत मोडनिंब रोडवर परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना गावात वा-यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या तलावातून मनोज अंकुश पवार, गणेश नितीन मुरकुंडे, संस्कार नितीन मुरकुंडे ही तीन शाळकरी मुले पडल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आणि रात्री ८ वाजता मृतदेह हाती लागले. त्यांना बाहेर काढताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तिघांचे मृतदेह रात्री शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही मुले सायंकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्याने पालकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ही मुले शेततळ्यात पडली कशी आणि नेमकी किती वाजता पाण्यात पडली हे काेणालाही सांगता येत नव्हते. या दुर्दैवी घटनेने करकंबवर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नोंदीचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर