शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना!

By संताजी शिंदे | Updated: April 12, 2023 16:55 IST

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती.

साेलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जमिनींवर लावण्यात आलेले 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात आले, त्यामुळे तब्बल २०५ दिवसाच्या आंदोलनानंतर बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना झाल्या. १४९ शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे झाल्यामुळे, आंदोलन मागे घेण्यात आले.

मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती. संपादनाची प्रक्रीया करण्यासाठी शासनाने सर्व जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'एमआयडीसी' असे नाव लावण्यात आले होते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करता येत नव्हती. आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, आमच्या ७/१२ वरील 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. २० सप्टेंबर २०२२ रोजी मंद्रुप येथील ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती, मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी १ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले, मात्र काही परिणाम झाला नाही. शेतकऱ्यांनी ९ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई असा बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. अखेर १४ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई बैलगाडी मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा विजापूर रोडवरील एजी पाटील कॉलेज जवळ मुक्कासाठी थांबला असता, त्यांना मुंबईला न जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मुंबईला जात आहे, तुमची मागणी मान्य होईल असे अश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी दक्षिण पंचायत समिती कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती.

 

टॅग्स :Solapurसोलापूर