शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

छावण्यांसाठी झाले २०० कोटी खर्च, पण पशुधन वाचले ७०० कोटींचे : राजेंद्र भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:18 PM

सोलापूर जिल्हा; सुरुवातीपासून नियोजन केल्याने चारा खर्चात नाही गडबड

ठळक मुद्देचारा आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यावर एप्रिलमध्ये चारा छावण्या सुरू केल्या सात महिने जिल्ह्यातील छावण्यांमध्ये एक लाखाच्यावर पशुधन होतेनवरात्रीनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चारा छावण्या आपोआप बंद झाल्या

सोलापूर : जिल्ह्यात एप्रिलपासून सात महिने चाललेल्या चारा छावण्यांसाठी २०० कोटींचा खर्च आला असला तरी दुष्काळात ७०० कोटींचे पशुधन वाचविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

जिल्ह्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी खरीप वाया गेला. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. दुष्काळाचे चटके जाणवू लागल्यावर फेब्रुवारीपासूनच टंचाईचे नियोजन सुरू करण्यात आले. चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यावर एप्रिलमध्ये चारा छावण्या सुरू केल्या. छावण्या सुरू करण्याआधी चालकांची बैठक घेतली. त्यांच्याकडील सूचना विचारात घेऊन ५१ मुद्दे काढले. त्यातून नवीन नियमावली करून छावणी सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागविले. आलेल्या प्रस्तावावर विचार करताना संबंधित संस्थांनी दिलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. ज्यांनी पूर्ण कागदपत्रे सादर केली आहेत, अशांना परवानगी देताना इतरांना त्याची माहिती दिली.

ज्यांना चारा छावणी चालविण्याबाबत परवानगी दिली त्यांच्याकडून १० लाखांची बँक गॅरंटी घेतली. संबंधित छावणी चालकांनी चारा कोठून आणला, याबाबत खरेदीचे व्हाऊचर घेतले. त्यामुळे बोगसगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला. छावणीचे कामकाज कसे चालते, यासाठी मी स्वत: मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावण्यांना भेट देऊन व्यवस्थेची माहिती घेतल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. 

नवरात्रीनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चारा छावण्या आपोआप बंद झाल्या. सात महिने जिल्ह्यातील छावण्यांमध्ये एक लाखाच्यावर पशुधन होते. जर छावण्या सुरू केल्या नसत्या तर यातील निम्मे पशुधन शेतकरी निम्या किमतीने बाजारात विकले असते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असते. तसेच आता बºयापैकी पाऊस पडल्यावर, असे पशुधन विकत घेणे त्यांना महागात पडले असते. आहे ते पशुधन जगविणे हे शेतकºयांच्यादृष्टीने फार महत्त्वाचे होते. त्यामुळे छावण्यांवर २०० कोटी खर्च झालेली रक्कम मोठी वाटत असली तरी त्यामुळे जगलेल्या पशुधनाची किमत ७०० कोटींची आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. 

कामाचा व्याप तरीही दिले लक्ष- जिल्ह्यात जानेवारीपासून टंचाई स्थितीकडे लक्ष दिले. मार्चपासून पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरचे नियोजन केले. त्यानंतर चाराटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. अशात लोकसभेची निवडणूक आली. निवडणुकीचे नियोजन करताना चारा छावण्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी सहकार खात्यावर दिली. त्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामातील टंचाई स्थितीकडे लक्ष दिले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भीमा, नीरा नदीला पूर आला. पुराच्या नियोजनानंतर विधानसभा निवडणूक लागली. आता निवडणूक संपते न संपते तोच अतिवृष्टीचा प्रश्न समोर आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळ