शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

प्रवासाचे ५० लाख प्रशासनाच्या खात्यावर; मजूर मात्र रस्त्यावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:15 IST

सोलापुरात नियोजनाचा अभाव; लॉकडाऊनच्या काळात लोकांचे हाल कायम

ठळक मुद्देउत्तरप्रदेश, बिहार राज्यात जाणाºयांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात येत आहेतपरराज्यातील लोकांना एसटीने मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची तयारी पायी जाणाºया मजुरांना विश्वास देणारा एकही अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून आला नाही

सोलापूर : परप्रांतातील मजुरांच्या प्रवास सेवेसाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर पाठवले आहेत; मात्र अजूनही शेकडो मजूर स्वखर्चाने गावी जात आहेत किंवा पायीच निघाले आहेत. अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त आणि लोक त्रस्त अशी अवस्था झाली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मजूर आणि सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. या आठवड्यात मजुरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे निधी पाठवला आहे. पण तो व्यवस्थित वापरात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन अनेक मजूर गावी पायी निघाल्याचे पाहायला मिळाले. झारखंडचे प्रदीप कुमार आणि त्यांचे कुटुंबीय सोरेगाव येथून पायी निघाले होते. दोनवेळा रेल्वे स्टेशनकडे पायी जाऊन आलो. इथे गेले की आम्हाला काही माहीत नाही म्हणून सांगतात. आम्ही किती दिवस वाट बघायची. आम्हाला इथे खायला काही नाही. आम्ही थांबणार नाही म्हणत ते चालत राहिले.

सात रस्ता येथील रस्त्यावर झारखंड येथील सात ते आठ तरुण झोपले होते. हे तरुण एनटीपीसीच्या परिसरात राहायला असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे तर सुरू झाली नाही. पण सोलापुरातून एखादी बस करुन गावी जाऊ. गावी जाण्यासाठी खर्च करण्याची तयारी असल्याचे या तरुणांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी तुळजापूर रोडने अनेक मजूर आपल्या कुटुंबासह पायी निघाल्याचे चित्र दिसत होते. पायी जाणाºया मजुरांना विश्वास देणारा एकही अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून आला नाही.

अधिकाºयांचे लक्ष केवळ निवारा केंद्रांकडे- महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये केवळ दोन ते अडीच हजार लोक होते. त्याहून अधिक लोक शहराच्या गल्ली, मोहल्ल्यांमध्ये अडकून पडले आहेत. या लोकांपर्यंत जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयातील अधिकारी पोहोचले नाहीत. महापालिकेच्या निवारा केंद्रात थांबलेल्या तामिळनाडूच्या नागरिकांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात आली. उर्वरित राज्यातील नागरिक स्वखर्चाने गावी निघाले आहेत. उत्तरप्रदेशमधील मजुरांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गाव गाठले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या बैठकांचे सत्र असते. या बैठकातून वरिष्ठ अधिकाºयांना वेळ मिळत नाही आणि कर्मचारी मात्र या गोष्टींकडे लक्ष देत नसल्याचे पाहायला मिळते.

उत्तरप्रदेश, बिहार राज्यात जाणाºयांसाठी सोलापुरातून रेल्वे सोडण्यात येत आहेत. लोकांनी चालत जाऊ नये म्हणून आम्ही आवाहन करतोय. पण लोक ऐकायला तयार नाहीत. परराज्यातील लोकांना एसटीने मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने नियोजन करीत आहेत. लोकांनी चालत जाऊ नये असे आवाहन यापूर्वी केले आहे. आताही करीत आहोत.-संजीव जाधव, अपर जिल्हाधिकारी, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस