शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची ४७१ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 17:14 IST

ऊस उत्पादक प्रतीक्षेत : कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी एफआरपी देऊन टाकली

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या १०१४ कोटी रुपये थकबाकीत एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे तब्बल ४७१ कोटी रुपयांचा समावेश आहे. दरवर्षी प्रमाणेच सोलापूरच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैशासाठी तिष्टत ठेवले आहे. सरत्या हंगामात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात विक्रमी ऊस गाळप झाले होते. कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी उसाचे संपूर्ण पैसे दिले आहेत.

मराठवाड्यातील काही मोजकेच साखर कारखाने सोडले तर राज्यातील साखर हंगाम मे महिन्यातच पूर्ण झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपही मार्च-एप्रिल महिन्यात पूर्ण झाले आहे. मात्र, साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाहीत. राज्यातील ११० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे १ हजार १४ कोटी रुपये दिले नाहीत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे ४७१ कोटी रुपये थकले आहेत. कारखाने बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र साखर कारखाने पैसे देण्याचे नाव घेत नाहीत. दरवर्षीच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने पुढील वर्षीचा गाळप हंगाम सुरु होण्याअगोदर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देतात. याही वर्षी तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची आहे.

दहामध्ये तीन सोलापूरचे...

५९ व ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी देणाऱ्या राज्यातील १० साखर कारखान्यामध्ये ३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. जय हिंद शुगर, इंद्रेश्वर शुगर व विठ्ठल रिफायनरी या तीन साखर कारखान्यांनी ७२ ते ७७ टक्के रक्कम दिली आहे.

* वैद्यनाथ परळी ४८ टक्के, राजगड भोर ५० टक्के, जय लक्ष्मी निवळी ५४ टक्के इतकीच एफआरपी दिली आहे.

* यामध्ये विठ्ठलराव शिंदे, श्री. पांडुरंग व इतर काही साखर कारखाने दरवर्षीच दिवाळीसाठी काही रक्कम राखून ठेवतात. याही वर्षी हे कारखाने दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.

* सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, बबनराव शिंदे, गोकुळ माउली या कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. गोकुळ धोत्री ६० लाख तर ओंकार चांदापुरीकडे अवघे ३३ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ९६.८४ टक्के एफआर दिली आहे. ३.१६ टक्के राहिलेल्या ऊस उत्पादकांचे पैसे जुलै अखेरपर्यंत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी काही कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देतील. मात्र जे देणार नाहीत अशा कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात येईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने