शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची ४७१ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 17:14 IST

ऊस उत्पादक प्रतीक्षेत : कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी एफआरपी देऊन टाकली

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या १०१४ कोटी रुपये थकबाकीत एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे तब्बल ४७१ कोटी रुपयांचा समावेश आहे. दरवर्षी प्रमाणेच सोलापूरच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैशासाठी तिष्टत ठेवले आहे. सरत्या हंगामात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात विक्रमी ऊस गाळप झाले होते. कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी उसाचे संपूर्ण पैसे दिले आहेत.

मराठवाड्यातील काही मोजकेच साखर कारखाने सोडले तर राज्यातील साखर हंगाम मे महिन्यातच पूर्ण झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपही मार्च-एप्रिल महिन्यात पूर्ण झाले आहे. मात्र, साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाहीत. राज्यातील ११० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे १ हजार १४ कोटी रुपये दिले नाहीत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे ४७१ कोटी रुपये थकले आहेत. कारखाने बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र साखर कारखाने पैसे देण्याचे नाव घेत नाहीत. दरवर्षीच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने पुढील वर्षीचा गाळप हंगाम सुरु होण्याअगोदर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देतात. याही वर्षी तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची आहे.

दहामध्ये तीन सोलापूरचे...

५९ व ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी देणाऱ्या राज्यातील १० साखर कारखान्यामध्ये ३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. जय हिंद शुगर, इंद्रेश्वर शुगर व विठ्ठल रिफायनरी या तीन साखर कारखान्यांनी ७२ ते ७७ टक्के रक्कम दिली आहे.

* वैद्यनाथ परळी ४८ टक्के, राजगड भोर ५० टक्के, जय लक्ष्मी निवळी ५४ टक्के इतकीच एफआरपी दिली आहे.

* यामध्ये विठ्ठलराव शिंदे, श्री. पांडुरंग व इतर काही साखर कारखाने दरवर्षीच दिवाळीसाठी काही रक्कम राखून ठेवतात. याही वर्षी हे कारखाने दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.

* सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, बबनराव शिंदे, गोकुळ माउली या कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. गोकुळ धोत्री ६० लाख तर ओंकार चांदापुरीकडे अवघे ३३ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ९६.८४ टक्के एफआर दिली आहे. ३.१६ टक्के राहिलेल्या ऊस उत्पादकांचे पैसे जुलै अखेरपर्यंत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी काही कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देतील. मात्र जे देणार नाहीत अशा कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात येईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने