शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची ४७१ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 17:14 IST

ऊस उत्पादक प्रतीक्षेत : कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी एफआरपी देऊन टाकली

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या १०१४ कोटी रुपये थकबाकीत एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे तब्बल ४७१ कोटी रुपयांचा समावेश आहे. दरवर्षी प्रमाणेच सोलापूरच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैशासाठी तिष्टत ठेवले आहे. सरत्या हंगामात राज्यात व सोलापूर जिल्ह्यात विक्रमी ऊस गाळप झाले होते. कोल्हापूरच्या सर्वच कारखान्यांनी उसाचे संपूर्ण पैसे दिले आहेत.

मराठवाड्यातील काही मोजकेच साखर कारखाने सोडले तर राज्यातील साखर हंगाम मे महिन्यातच पूर्ण झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपही मार्च-एप्रिल महिन्यात पूर्ण झाले आहे. मात्र, साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाहीत. राज्यातील ११० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे १ हजार १४ कोटी रुपये दिले नाहीत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे ४७१ कोटी रुपये थकले आहेत. कारखाने बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र साखर कारखाने पैसे देण्याचे नाव घेत नाहीत. दरवर्षीच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने पुढील वर्षीचा गाळप हंगाम सुरु होण्याअगोदर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देतात. याही वर्षी तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची आहे.

दहामध्ये तीन सोलापूरचे...

५९ व ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी देणाऱ्या राज्यातील १० साखर कारखान्यामध्ये ३ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. जय हिंद शुगर, इंद्रेश्वर शुगर व विठ्ठल रिफायनरी या तीन साखर कारखान्यांनी ७२ ते ७७ टक्के रक्कम दिली आहे.

* वैद्यनाथ परळी ४८ टक्के, राजगड भोर ५० टक्के, जय लक्ष्मी निवळी ५४ टक्के इतकीच एफआरपी दिली आहे.

* यामध्ये विठ्ठलराव शिंदे, श्री. पांडुरंग व इतर काही साखर कारखाने दरवर्षीच दिवाळीसाठी काही रक्कम राखून ठेवतात. याही वर्षी हे कारखाने दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.

* सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, विठ्ठल कार्पोरेशन, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, बबनराव शिंदे, गोकुळ माउली या कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. गोकुळ धोत्री ६० लाख तर ओंकार चांदापुरीकडे अवघे ३३ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ९६.८४ टक्के एफआर दिली आहे. ३.१६ टक्के राहिलेल्या ऊस उत्पादकांचे पैसे जुलै अखेरपर्यंत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी काही कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देतील. मात्र जे देणार नाहीत अशा कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात येईल.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने