शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील ३० हजार वाहनधारकांना दीड कोटींचा दंड; हेल्मेट न घातल्याचा फटका, पोलिसांची मोठी कारवाई

By appasaheb.patil | Updated: February 14, 2023 15:08 IST

अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे.

सोलापूर : दुचाकीवरून ये-जा करणाऱ्यांची संख्या सोलापुरात लाखोंच्या घरात आहे. दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दुचाकीवरून अपघात झाल्यास थेट मेंदूला इजा होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्या वाहनचालकांची संख्या ७० ते ८० टक्के आहे. अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे. मागील दोन वर्षात ३० हजार वाहनधारकांना तब्बल दीड कोटीपर्यंतचा दंड सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ठोठावला आहे.

हेल्मेटचा वापर स्वत:च्या भल्यासाठी अथवा सुरक्षेकरिता आहे. प्रत्येक वाहनधारकाने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. डोक्याला झालेली दुखापत किंवा आघात त्याचा परिणाम पेशंटवरच होत नाही तर त्याच्या कुटुंबीयांवर होतो. अपघातांचा मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परिणाम पेशंटसह सर्वांवर होतो. त्यामुळे स्वत:सोबतच आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

डोक्याची दुखापत होऊन तरुण किंवा घरातील कमावणारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर बरे होण्यास जास्त वेळ लागल्यास त्याचा कुटुंबावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. सध्या हेल्मेटविना गाडी चालविणे तसेच गाडी चालविताना हेडफोनचा वापर करून मोबाइलवर बोलत राहण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे. हा प्रकार खूपच धोकादायक आहे.

हेल्मेट न वापरल्यास दंड किती ?दुचाकी चालविताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर नक्की करावा. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना वाहतूक शाखेच्यावतीने १ हजार रुपये दंड केला जातो. वारंवार तोच नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढते. दंड न भरल्यास वाहनधारकास कोर्टाची पायरी चढावी लागते, असेही वाहतूक शाखेने सांगितले.

आधुनिक काळात मेंदू सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट आवश्यक आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे हिताचे ठरू शकते. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा अपघातात मृत्यू होतो. तर अनेकांना अपंगत्व प्राप्त होते. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या निश्चितच कमी होऊ शकते.

- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण 

टॅग्स :Solapurसोलापूरtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस