शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सोलापुरातील ३० हजार वाहनधारकांना दीड कोटींचा दंड; हेल्मेट न घातल्याचा फटका, पोलिसांची मोठी कारवाई

By appasaheb.patil | Updated: February 14, 2023 15:08 IST

अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे.

सोलापूर : दुचाकीवरून ये-जा करणाऱ्यांची संख्या सोलापुरात लाखोंच्या घरात आहे. दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दुचाकीवरून अपघात झाल्यास थेट मेंदूला इजा होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्या वाहनचालकांची संख्या ७० ते ८० टक्के आहे. अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे. मागील दोन वर्षात ३० हजार वाहनधारकांना तब्बल दीड कोटीपर्यंतचा दंड सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ठोठावला आहे.

हेल्मेटचा वापर स्वत:च्या भल्यासाठी अथवा सुरक्षेकरिता आहे. प्रत्येक वाहनधारकाने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. डोक्याला झालेली दुखापत किंवा आघात त्याचा परिणाम पेशंटवरच होत नाही तर त्याच्या कुटुंबीयांवर होतो. अपघातांचा मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परिणाम पेशंटसह सर्वांवर होतो. त्यामुळे स्वत:सोबतच आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

डोक्याची दुखापत होऊन तरुण किंवा घरातील कमावणारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर बरे होण्यास जास्त वेळ लागल्यास त्याचा कुटुंबावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. सध्या हेल्मेटविना गाडी चालविणे तसेच गाडी चालविताना हेडफोनचा वापर करून मोबाइलवर बोलत राहण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे. हा प्रकार खूपच धोकादायक आहे.

हेल्मेट न वापरल्यास दंड किती ?दुचाकी चालविताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर नक्की करावा. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना वाहतूक शाखेच्यावतीने १ हजार रुपये दंड केला जातो. वारंवार तोच नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढते. दंड न भरल्यास वाहनधारकास कोर्टाची पायरी चढावी लागते, असेही वाहतूक शाखेने सांगितले.

आधुनिक काळात मेंदू सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट आवश्यक आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे हिताचे ठरू शकते. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा अपघातात मृत्यू होतो. तर अनेकांना अपंगत्व प्राप्त होते. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या निश्चितच कमी होऊ शकते.

- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण 

टॅग्स :Solapurसोलापूरtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस