Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

By Appasaheb.patil | Published: September 5, 2020 01:10 PM2020-09-05T13:10:17+5:302020-09-05T13:14:58+5:30

उजनी धरणावरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित; इंदापूर, वालचंदनगर अन् बारामतीला वापरली जातेय वीज

3 lakh units of electricity is generated on Ujani dam in 24 hours | Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पार झाला आहे़ दरम्यान, धरणातील पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाला सोडण्यात आल्यामुळे धरणावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे़ सध्या २४ तासाला ३ लाख युनिट विजेची निर्मिती होत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आऱ एस़ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यात असे विविध ठिकाणी चार प्रकल्प असून, यात उजनी वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जलविद्युत विभागाच्या मालकीचा असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला आहे. अशा प्रकारचा रिव्हरसेबल प्लांट महाराष्ट्रात जायकवाडी येथे १२ मेगावॅट, भाटघर येथे २५ मेगावॅटचे दोन संच कार्यरत आहेत, असे चार प्लांट आहेत. या प्रकल्पाची खोली जमीन लेव्हलपासून शंभर फूट खोलीवर असून, टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते व भीमानगर येथून सीना-माढा पंपहाऊसलादेखील वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर इथे तशी व्यवस्था केली आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर याच धरणावर मे १९९४ रोजी वीज प्रकल्प कार्यान्वित झाला.
---------
१०० दिवसच चालतो हा प्रकल्प
उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़ अन्यथा हा प्रकल्प बंदच असतो़ वर्षभरात केवळ १०० दिवसच हा प्रकल्पातून विजेची निर्मिती करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले़ वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात पाणी सोडले जाते. एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता आहे. २४ तासांत दोन लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो़

Web Title: 3 lakh units of electricity is generated on Ujani dam in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.