शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:37 IST

जिल्हा बँक: एकरकमी परतफेड योजनेतून बँकेला मिळाले १०२ कोटी

ठळक मुद्देशासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप

सोलापूर : दीड लाखावरील रक्कम भरा व कर्जमुक्त व्हा असा संदेश शेतकºयांपर्यंत गेल्याने मागील जून महिन्यात २३२६ शेतकºयांनी कर्जापोटी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये भरल्याने शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत. एक रकमी परतफेड योजनेतून जिल्हा बँकेला आतापर्यंत १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४० रुपये मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी २४ जून रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांचे दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या सर्वच शेतकºयांचे कर्ज शासनाने भरले असून दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करीत आहे. सोलापूर जिल्हा बँकेचे दीड लाखावरील कर्जदार १७ हजार २७३ इतके शेतकरी ‘ग्रीन’ यादीत आले आहेत. यापैकी ३० जूनअखेर ६ हजार ४४६ शेतकºयांनी दीड लाखावरील ४४ कोटी ५० लाख ५९ हजार ३२२ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत.

शासनाने दीड लाखाप्रमाणे ७७ कोटी २७ लाख ४० हजार ३४८ रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांनी  दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा झालेली रक्कम अशी १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४०  रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेला मिळाली आहे. 

एकरकमी परतफेड योजनेंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरण्यास वेग आला तो जिल्हा बँकेने नव्याने कर्ज देण्याची हमी दिल्यानंतर. प्रशासक अविनाश देशमुख यांनी दीड लाखावरील रक्कम भरणाºयांना पुन्हा पीक पाहून कर्ज देण्यास सुरुवात केल्याने जून या एकाच महिन्यात २३२६ शेतकºयांनी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये कर्ज खात्यावर भरले आहेत. 

शासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी - दीड लाखावरील थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या ‘ग्रीन’ यादीतील १० हजार ८२७ शेतकºयांनी अद्यापही दीड लाखावरील रक्कम भरलेली नाही. या शेतकºयांनी १६९ कोटी ९१ लाख ९६ हजार २४५ रुपये भरल्यानंतर त्यांच्या खात्यावर ९२ कोटी ६६ लाख ६७ हजार ६५० रुपये शासन जमा करणार आहे. यापैकी बहुतेक शेतकरी हे मोठे बागायतदार म्हणून कर्ज दिलेले आहेत. अनेकांना क्षेत्र कमी असताना व द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले आहे.दीड लाखाप्रमाणे २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा झाले आहेत.  

शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील कर्ज तत्काळ भरावे व नव्याने कर्ज घेऊन कर्जमुक्त व्हावे. पीक पाहून कर्ज दिले जाईल. - अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी