शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:37 IST

जिल्हा बँक: एकरकमी परतफेड योजनेतून बँकेला मिळाले १०२ कोटी

ठळक मुद्देशासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप

सोलापूर : दीड लाखावरील रक्कम भरा व कर्जमुक्त व्हा असा संदेश शेतकºयांपर्यंत गेल्याने मागील जून महिन्यात २३२६ शेतकºयांनी कर्जापोटी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये भरल्याने शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत. एक रकमी परतफेड योजनेतून जिल्हा बँकेला आतापर्यंत १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४० रुपये मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी २४ जून रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांचे दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या सर्वच शेतकºयांचे कर्ज शासनाने भरले असून दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करीत आहे. सोलापूर जिल्हा बँकेचे दीड लाखावरील कर्जदार १७ हजार २७३ इतके शेतकरी ‘ग्रीन’ यादीत आले आहेत. यापैकी ३० जूनअखेर ६ हजार ४४६ शेतकºयांनी दीड लाखावरील ४४ कोटी ५० लाख ५९ हजार ३२२ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत.

शासनाने दीड लाखाप्रमाणे ७७ कोटी २७ लाख ४० हजार ३४८ रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांनी  दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा झालेली रक्कम अशी १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४०  रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेला मिळाली आहे. 

एकरकमी परतफेड योजनेंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरण्यास वेग आला तो जिल्हा बँकेने नव्याने कर्ज देण्याची हमी दिल्यानंतर. प्रशासक अविनाश देशमुख यांनी दीड लाखावरील रक्कम भरणाºयांना पुन्हा पीक पाहून कर्ज देण्यास सुरुवात केल्याने जून या एकाच महिन्यात २३२६ शेतकºयांनी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये कर्ज खात्यावर भरले आहेत. 

शासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी - दीड लाखावरील थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या ‘ग्रीन’ यादीतील १० हजार ८२७ शेतकºयांनी अद्यापही दीड लाखावरील रक्कम भरलेली नाही. या शेतकºयांनी १६९ कोटी ९१ लाख ९६ हजार २४५ रुपये भरल्यानंतर त्यांच्या खात्यावर ९२ कोटी ६६ लाख ६७ हजार ६५० रुपये शासन जमा करणार आहे. यापैकी बहुतेक शेतकरी हे मोठे बागायतदार म्हणून कर्ज दिलेले आहेत. अनेकांना क्षेत्र कमी असताना व द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले आहे.दीड लाखाप्रमाणे २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा झाले आहेत.  

शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील कर्ज तत्काळ भरावे व नव्याने कर्ज घेऊन कर्जमुक्त व्हावे. पीक पाहून कर्ज दिले जाईल. - अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी