शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

राज्यात गाळप परवाने १७५ कारखान्यांना; मात्र सुरू झाले फक्त १३१ कारखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:15 IST

९८ लाख मेट्रिक टन गाळप; पुढील महिन्यात १९० कारखाने सुरू होण्याचा अंदाज

सोलापूर : दिवाळी सणानंतर राज्यात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला आहे. सोमवारपर्यंत १३१ साखर कारखान्यांचे ९८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. डिसेंबर महिन्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत १७५ कारखान्यांना परवाने दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

राज्य शासनाने १५ ऑक्टोबरपासून जरी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पावसामुळे कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. दिवाळी अगोदर जवळपास १०० कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. दिवाळीनंतर ५० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असल्याचे सांगण्यात आले. मात्र एफआरपी चुकती केली नसल्याने कारखाना सुरू केल्याचे दाखविले जात नाही. साखर आयुक्त कार्यालयाकडे १३१ साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती दिली आहे. या १३१ साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ९८ लाख मेट्रिक टन गाळप केले असून ८४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

ऊस तोडणी यंत्रणा तसेच इतर कारणांमुळे परवाना घेतलेल्या अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. शिवाय काहींनी कारखाने सुरू केले, मात्र मागील वर्षीची एफआरपी दिली नसल्याने गाळप सुरू केल्याचे कळविले जात नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील व ऊस गाळपाला अधिक वेग येईल, असे सांगण्यात आले.

सोलापूर विभागाचे सर्वाधिक कारखाने

सध्या सोलापूर विभागातील २९, कोल्हापूर विभागातील २८, पुणे विभागातील २५, अहमदनगर विभाग १८, नांदेड विभाग १६, औरंगाबाद विभाग १३, अमरावती विभागात दोन कारखाने सुरू झाले तर नागपूर विभागात एकही कारखाना सुरू झाल्याची नोंद नाही.

कारखाने सुरू मात्र...

सोलापूर जिल्ह्यातील शंकर सहकारी, सिद्धेश्वर कुमठे, ओंकार, भीमा सहकारी टाकळी सिकंदर, सांगोला, सिद्धनाथ, लोकमंगल बिबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे या सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाला सादर केली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी