शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गाळप परवाने १७५ कारखान्यांना; मात्र सुरू झाले फक्त १३१ कारखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:15 IST

९८ लाख मेट्रिक टन गाळप; पुढील महिन्यात १९० कारखाने सुरू होण्याचा अंदाज

सोलापूर : दिवाळी सणानंतर राज्यात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला आहे. सोमवारपर्यंत १३१ साखर कारखान्यांचे ९८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. डिसेंबर महिन्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत १७५ कारखान्यांना परवाने दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

राज्य शासनाने १५ ऑक्टोबरपासून जरी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पावसामुळे कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. दिवाळी अगोदर जवळपास १०० कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. दिवाळीनंतर ५० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असल्याचे सांगण्यात आले. मात्र एफआरपी चुकती केली नसल्याने कारखाना सुरू केल्याचे दाखविले जात नाही. साखर आयुक्त कार्यालयाकडे १३१ साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती दिली आहे. या १३१ साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ९८ लाख मेट्रिक टन गाळप केले असून ८४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

ऊस तोडणी यंत्रणा तसेच इतर कारणांमुळे परवाना घेतलेल्या अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. शिवाय काहींनी कारखाने सुरू केले, मात्र मागील वर्षीची एफआरपी दिली नसल्याने गाळप सुरू केल्याचे कळविले जात नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील व ऊस गाळपाला अधिक वेग येईल, असे सांगण्यात आले.

सोलापूर विभागाचे सर्वाधिक कारखाने

सध्या सोलापूर विभागातील २९, कोल्हापूर विभागातील २८, पुणे विभागातील २५, अहमदनगर विभाग १८, नांदेड विभाग १६, औरंगाबाद विभाग १३, अमरावती विभागात दोन कारखाने सुरू झाले तर नागपूर विभागात एकही कारखाना सुरू झाल्याची नोंद नाही.

कारखाने सुरू मात्र...

सोलापूर जिल्ह्यातील शंकर सहकारी, सिद्धेश्वर कुमठे, ओंकार, भीमा सहकारी टाकळी सिकंदर, सांगोला, सिद्धनाथ, लोकमंगल बिबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे या सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाला सादर केली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी