शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राज्यात गाळप परवाने १७५ कारखान्यांना; मात्र सुरू झाले फक्त १३१ कारखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:15 IST

९८ लाख मेट्रिक टन गाळप; पुढील महिन्यात १९० कारखाने सुरू होण्याचा अंदाज

सोलापूर : दिवाळी सणानंतर राज्यात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला आहे. सोमवारपर्यंत १३१ साखर कारखान्यांचे ९८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. डिसेंबर महिन्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत १७५ कारखान्यांना परवाने दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

राज्य शासनाने १५ ऑक्टोबरपासून जरी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पावसामुळे कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. दिवाळी अगोदर जवळपास १०० कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. दिवाळीनंतर ५० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असल्याचे सांगण्यात आले. मात्र एफआरपी चुकती केली नसल्याने कारखाना सुरू केल्याचे दाखविले जात नाही. साखर आयुक्त कार्यालयाकडे १३१ साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती दिली आहे. या १३१ साखर कारखान्यांनी सोमवारपर्यंत ९८ लाख मेट्रिक टन गाळप केले असून ८४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

ऊस तोडणी यंत्रणा तसेच इतर कारणांमुळे परवाना घेतलेल्या अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. शिवाय काहींनी कारखाने सुरू केले, मात्र मागील वर्षीची एफआरपी दिली नसल्याने गाळप सुरू केल्याचे कळविले जात नाही. डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात १९० हून अधिक साखर कारखाने सुरू होतील व ऊस गाळपाला अधिक वेग येईल, असे सांगण्यात आले.

सोलापूर विभागाचे सर्वाधिक कारखाने

सध्या सोलापूर विभागातील २९, कोल्हापूर विभागातील २८, पुणे विभागातील २५, अहमदनगर विभाग १८, नांदेड विभाग १६, औरंगाबाद विभाग १३, अमरावती विभागात दोन कारखाने सुरू झाले तर नागपूर विभागात एकही कारखाना सुरू झाल्याची नोंद नाही.

कारखाने सुरू मात्र...

सोलापूर जिल्ह्यातील शंकर सहकारी, सिद्धेश्वर कुमठे, ओंकार, भीमा सहकारी टाकळी सिकंदर, सांगोला, सिद्धनाथ, लोकमंगल बिबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे या सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाला सादर केली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी