शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत; आज ४१.१ अंश सेल्सिअसची नोंद 

By शीतलकुमार कांबळे | Published: April 25, 2024 6:45 PM

एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाऊल याचा परिणाम हवामानावर होत आहे.

सोलापूर : एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाऊल याचा परिणाम हवामानावर होत आहे. त्यामुळे कमाल व किमाम  तापमानात १६ अंशाची तफावत जाणवत आहे. गुरुवार २५ एप्रिल रोजी ४१.१ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेदुकी अशा तक्रारी सोलापूरकर करत आहेत.

रात्री आणि पहाटे वातावरणात असलेला गारवा आणि दुपारी उन्हाच्या झळांचा अनुभव सोलापूरकर सध्या घेत आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात तब्बल १६ अंशांचा फरक आहे. किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत जाणवत असून दिवसा उन्हाचा चटका सध्या जाणवत आहे. वातावरणात फारशी आर्द्रता नसल्याने कोरड्या झळांचा त्रास होत आहे. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमी अधिक प्रमाणात रात्री दमट वातावरण असते. पावसामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा असतो. त्यामुळे एकाच दिवसात गारवा आणि उकाड्याचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २५ ते २९ एप्रिल दरम्यान फक्त २७ एप्रिल रोजीच पाऊस पडणार आहे. त्यामुळे २७ एप्रिल पर्यंत तापमानात वाढ होऊन पुन्हा तापमानात घट होईल. २७ एप्रिल नंतर पावसाची शक्यता नसल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल व किमान तापमानात आणखी तफावत होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर