शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पुणे विभागातील १५ साखर कारखान्यांकडे ‘एफआरपी’ चे १५१ कोटीची थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 10:57 IST

पुणे विभागातील एफआरपी : सोलापूरच्या ११ कारखान्यांकडील ९० कोटींचा समावेश

ठळक मुद्दे२०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम मार्च २०१८ मध्ये संपलापुणे जिल्ह्यातील एका कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार थकबाकीसातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे ५५ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी

अरूण बारसकर  सोलापूर: पुणे विभागातील सोलापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांकडे मागील वर्षीच्या उसाचे ‘एफआरपी’ नुसार(किमान व किफायतशीर दर) १५१ कोटी ५५ लाख १८ हजार रुपये  इतके शेतकºयांचे देणे थकले आहे. यामध्ये  सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांकडील ९० कोटी ७० लाख ८ हजार रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती साखर संचालकांच्या कार्यालयातून देण्यात आली.

२०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम मार्च २०१८ मध्ये संपला. गाळप संपल्यापासून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे; मात्र काही साखर कारखान्यांनी एफआरपीनुसारही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. मागील वर्षी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १७, साताराच्या १५ व सोलापूरच्या ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यामध्ये गोकुळ माऊली साखर कारखान्याने चाचणी हंगाम घेतल्याने १३ हजार १४८ मे.टन गाळप झाले होते.

पुणे विभागातील गाळप घेतलेल्या ६३ पैकी ४८ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’नुसार व काही कारखान्यांनी ‘एफआरपी’ पेक्षाही अधिक रक्कम ऊस उत्पादक शेतकºयांना दिली आहे. पुणे जिल्ह्यातील एका कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार तर सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे ५५ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. प्रादेशिक संचालक व साखर आयुक्तांनी शेतकºयांचे पैसे देण्याबाबत नोटिसा देऊनही कारखाने पैसे देण्यास तयार नाहीत. यापैकी काही साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले असले तरी त्याला सहकारमंत्र्यांनीच स्थगिती दिली आहे. सहकारमंत्र्यांनी कारखान्यांना शेतकºयांचे पैसे देण्यासाठी संधी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने संपूर्ण थकीत रक्कम दिली आहे.

मातोश्री शुगरकडे सर्वाधिक थकबाकी 

च्सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे २२ कोटी २४ लाख, संत दामाजी ४ कोटी २७ लाख ४९ हजार, विठ्ठल साखर कारखान्याकडे १९ कोटी ४० लाख ४७ हजार, मकाई साखर कारखान्याकडे एक कोटी ५९ लाख ४२ हजार, संत कूर्मदास कारखान्याकडे ६५ लाख ८२ हजार, सिद्धनाथ शुगरकडे ५ कोटी १२ लाख, गोकुळ शुगरकडे ५ कोटी ७१ लाख, मातोश्री लक्ष्मी शुगरकडे २३ कोटी ७१ लाख ५२ हजार, बबनराव शिंदे कारखान्याकडे एक कोटी ९६ लाख ५० हजार, जयहिंद शुगरकडे ६२ लाख तर विठ्ठल रिफाईन शुगरकडे ६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.

च्सातारा जिल्ह्यातील न्यू फलटणकडे ४८ कोटी ४१ लाख ८२ हजार, ग्रीन पॉवरकडे ४ कोटी ९ लाख ५७ हजार तर स्वराज इंडियाकडे दोन कोटी २५ लाख ५७ हजार तर पुणे जिल्ह्यातील राजगड कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. 

लोकमंगल साखर कारखान्याने २२०० रुपयांप्रमाणे तर सिद्धेश्वरने १८०० रुपयांप्रमाणे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. भीमा साखर कारखान्याने संपूर्ण थकबाकी दिली आहे. अन्य कारखान्यांनीही थकबाकी द्यावी यासाठी गुरुवारी सहकारमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.- महामूद पटेल,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी