शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:53 IST

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले ...

ठळक मुद्देसांगोला तालुका, कृषी विभागाकडून ८७ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटपशेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मातशेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदत

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. एकूण ११८ शेतकºयांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली असून ५९ लाख रुपयांचे अनुदान मागणीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांना अनुदान वाटप केले जाईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली. 

सांगोला तालुक्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमच भेडसावत राहिल्याने शेतकºयांचा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेण्याकडे कल वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यात नेहमीच पाऊसमान कमी राहिल्याने दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी शेतात जिथे पाणी लागेल अशा ठिकाणी विंधन विहिरी, विहिरीची खोदाई करुन पाण्यासाठी धडपडत आहेत. विंधन विहीर किंवा विहीर खोदूनही शेतीला पाणी कमीच पडत आहे. म्हणूनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी शेततळी घेण्यावर अधिक भर दिला आहे. 

शासनाच्या विविध योजनांसह मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेतकºयांनी आपापल्या शेतात ४० बाय ४०, ६० बाय ६०, १०० बाय १०० अशा लांबी-रुंदी-खोलीची शेततळी तयार करुन कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा तयार केला आहे. शेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मात करीत आहेत. शेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदतही होत आहे. त्यामुळे शेततळी हाच शेतकºयांचा जीवनातील अविभाज्य घटक बनत चालला आहे.

तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान व गळीत धान्य अभियानासह शेतकºयांनी स्वखर्चातून हजारो शेततळ्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती दीपाली जाधव यांनी दिली़ 

शेततळ्यात आघाडी घेतलेली गावे- शेततळी घेण्याच्या बाबतीत सांगोला तालुक्यातील अजनाळे, य. मंगेवाडी, वाकी-शिवणे, शिवणे, महुद, खिलारवाडी, गायगव्हाण, चिकमहुद, हलदहिवडी, शिरभावी, संगेवाडी, अकोला, कडलास, वाढेगाव ही गावे आघाडीवर आहेत, असे दीपाली जाधव यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ