शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:53 IST

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले ...

ठळक मुद्देसांगोला तालुका, कृषी विभागाकडून ८७ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटपशेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मातशेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदत

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. एकूण ११८ शेतकºयांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली असून ५९ लाख रुपयांचे अनुदान मागणीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांना अनुदान वाटप केले जाईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली. 

सांगोला तालुक्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमच भेडसावत राहिल्याने शेतकºयांचा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेण्याकडे कल वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यात नेहमीच पाऊसमान कमी राहिल्याने दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी शेतात जिथे पाणी लागेल अशा ठिकाणी विंधन विहिरी, विहिरीची खोदाई करुन पाण्यासाठी धडपडत आहेत. विंधन विहीर किंवा विहीर खोदूनही शेतीला पाणी कमीच पडत आहे. म्हणूनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी शेततळी घेण्यावर अधिक भर दिला आहे. 

शासनाच्या विविध योजनांसह मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेतकºयांनी आपापल्या शेतात ४० बाय ४०, ६० बाय ६०, १०० बाय १०० अशा लांबी-रुंदी-खोलीची शेततळी तयार करुन कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा तयार केला आहे. शेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मात करीत आहेत. शेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदतही होत आहे. त्यामुळे शेततळी हाच शेतकºयांचा जीवनातील अविभाज्य घटक बनत चालला आहे.

तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान व गळीत धान्य अभियानासह शेतकºयांनी स्वखर्चातून हजारो शेततळ्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती दीपाली जाधव यांनी दिली़ 

शेततळ्यात आघाडी घेतलेली गावे- शेततळी घेण्याच्या बाबतीत सांगोला तालुक्यातील अजनाळे, य. मंगेवाडी, वाकी-शिवणे, शिवणे, महुद, खिलारवाडी, गायगव्हाण, चिकमहुद, हलदहिवडी, शिरभावी, संगेवाडी, अकोला, कडलास, वाढेगाव ही गावे आघाडीवर आहेत, असे दीपाली जाधव यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ