शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:53 IST

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले ...

ठळक मुद्देसांगोला तालुका, कृषी विभागाकडून ८७ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटपशेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मातशेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदत

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. एकूण ११८ शेतकºयांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली असून ५९ लाख रुपयांचे अनुदान मागणीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांना अनुदान वाटप केले जाईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली. 

सांगोला तालुक्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमच भेडसावत राहिल्याने शेतकºयांचा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेण्याकडे कल वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यात नेहमीच पाऊसमान कमी राहिल्याने दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी शेतात जिथे पाणी लागेल अशा ठिकाणी विंधन विहिरी, विहिरीची खोदाई करुन पाण्यासाठी धडपडत आहेत. विंधन विहीर किंवा विहीर खोदूनही शेतीला पाणी कमीच पडत आहे. म्हणूनच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी शेततळी घेण्यावर अधिक भर दिला आहे. 

शासनाच्या विविध योजनांसह मागेल त्याला शेततळे या योजनेतून शेतकºयांनी आपापल्या शेतात ४० बाय ४०, ६० बाय ६०, १०० बाय १०० अशा लांबी-रुंदी-खोलीची शेततळी तयार करुन कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा तयार केला आहे. शेतकरी आता हेच पाणी शेतातील उभी पिके, फळबागांना देऊन पाणीटंचाईवर मात करीत आहेत. शेततळ्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास मदतही होत आहे. त्यामुळे शेततळी हाच शेतकºयांचा जीवनातील अविभाज्य घटक बनत चालला आहे.

तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान व गळीत धान्य अभियानासह शेतकºयांनी स्वखर्चातून हजारो शेततळ्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती दीपाली जाधव यांनी दिली़ 

शेततळ्यात आघाडी घेतलेली गावे- शेततळी घेण्याच्या बाबतीत सांगोला तालुक्यातील अजनाळे, य. मंगेवाडी, वाकी-शिवणे, शिवणे, महुद, खिलारवाडी, गायगव्हाण, चिकमहुद, हलदहिवडी, शिरभावी, संगेवाडी, अकोला, कडलास, वाढेगाव ही गावे आघाडीवर आहेत, असे दीपाली जाधव यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ