शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

२० लाखांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता! व्यापाऱ्यांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:32 IST

कोलारहून राजस्थानला निघालेला २० लाख रुपयांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

देशभरात टोमॅटोच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. देशभरात टोमॅटोचे दर २०० रुपयांवर गेले आहेत. काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटोची विक्री करून मोठा नफा कमावला आहे. यासोबतच टोमॅटो चोरी आणि लुटीच्या अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. आता नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, कर्नाटकातील कोलार येथून राजस्थानकडे निघालेला २० लाख रुपये किमतीचा टोमॅटोचा ट्रक गूढपणे बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांनी कोलार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये २७ जुलै रोजी कोलार एपीएमसी यार्डमधून राजस्थानमधील जयपूरला टोमॅटो घेऊन जाण्यासाठी दोन व्यापाऱ्यांनी ट्रक बुक केले होते.

अजुनही टोमॅटोचे दर कमी आलेले नाहीत. १५० ते २०० रुपये किलो टोमॅटोचे दर आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक शनिवारी रात्री जयपूरला पोहोचायला पाहिजे होता, पण ट्रक त्या वेळेत पोहोचला नाही.  चालकाचा मोबाईल फोन बंद आहे. ट्रक ऑपरेटरशी देखील योग्य प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोला व्यापार्‍याने काही गैरप्रकार झाल्याचा संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

लांब, छोटी की मध्यम...तुमच्या माने आकार सांगतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीपीएस ट्रॅकरनुसार, ट्रकने कोलारपासून सुमारे १,६०० किमी अंतर कापले होते. त्यानंतर वाहनाचा पत्ता समजला नाही. ट्रकच्या क्लिनरकडे मोबाईल नसल्यामुळे ट्रकचा शोध घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक गायब झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत, ट्रकला अपघात झाला असता तर आतापर्यंत माहिती मिळाली असती, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. चालक ट्रक घेऊन पळून गेला अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFarmerशेतकरी