शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पाकिस्तान ते भारत प्रवास, रेल्वेच्या AC-3 कोचचं भाडे फक्त ४ रुपये; तिकीट पाहून लोक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:43 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे.

नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या काळातील दराचे रेल्वे तिकीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे तिकीट पाकिस्तानमधील रावळपिंडी ते अमृतसर दरम्यानच्या प्रवासासाठी आहे. नऊ प्रवाशांच्या प्रवासासाठी हे तिकीट काढण्यात आले होते. सोशल मीडियावर एवढं जुनं तिकिट आणि किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यावेळी नऊ जणांच्या तिकिटासाठी केवळ ३६ रुपये आणि ९ आणे आकारले जात होते. लोक आजच्या तिकीट दराशी याची तुलना करत आहेत. 

तिकीट सोशल मीडियावर व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे. तिकिटाचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १७-०९-१९४७ रोजी रावळपिंडी ते अमृतसर प्रवास करण्यासाठी ९ लोकांना जारी करण्यात आलेल्या रेल्वे तिकिटाचा हा फोटो आहे. ज्याची किंमत ३६ रुपये आणि ९ आणे आहे. कदाचित एखादे कुटुंब भारतात गेले असावे. हे ९ लोकांसाठी तिकीट आहे. म्हणजे त्याकाळी माणसाचे भाडे सुमारे ४ रुपये असायचे.

पेनाने लिहून दिलेले तिकीटया रेल्वे तिकीटाची तारीख १७ सप्टेंबर १९४७ आहे. पेनच्या साहाय्याने हे तिकीट हाताने बनवले आहे. त्याकाळी संगणकीकृत तिकीट प्रचलित नव्हते. तिकीट उत्तर पश्चिम रेल्वेचे आहे. एसी-३ कोचचे असल्याचेही तिकिटावर लिहिलेले आहे. या पोस्टच्या कमेंटमध्ये लोकांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानच्या भागात नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोन होता. तिकिटावरील हे तिकिट परदेशी नागरिकाचे आहे, अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिली. बरं, त्यावेळी पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी तिकीट मिळणं सोपं होतं, पण आता ही प्रक्रिया खूपच अवघड झाली आहे.

रेल्वेचे जुने तिकीट पाहून पोस्टवर कमेंटचा पाऊस१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. यानंतर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर लोक भारतात आले. हे तिकीट त्या कुटुंबांपैकी कोणाचेही असू शकते. फोटोवर कमेंट करत लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तारा चंद नावाच्या यूजरने लिहिले की, 'त्या काळात ही किंमत खूप जास्त असतील, काही श्रीमंत लोक असतील, सामान्य लोक पायी चालत होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानrailwayरेल्वे