शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

माणुसकीला सलाम! मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा; कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच पळून गेला मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 19:14 IST

Viral News : त्यांचा मुलगा आणि जवळील लोक घाबरले आणि कोरोना संक्रमणामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटली.

कोरोनाकाळात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना देशाच्या वेगवेगळ्या भागातून समोर येत आहेत. जिल्ह्यातील राणीगंज पंचायतीच्या तेतरिया गावात मुस्लिम समाजातील लोकांनी पुन्हा एकदा आदर्शाचे एक उदाहरण मांडले आहे. दिग्विजय प्रसाद यांची ५८ वर्षांची पत्नी पार्वती देवी कित्येक महिन्यांपासून आजारी होती. त्यांना उपचारासाठी पीएचसीमध्ये दाखल केले गेले, तिथे बरे झाल्यानंतर कोरोना तपासणी करण्यात आली. हा अहवाल नकारात्मक आल्यानंतर घरी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. यावेळी, त्यांचा मुलगा आणि जवळील लोक भीतीने घाबरले आणि कोरोना संक्रमणामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटली.

काही वेळानंतर जेव्हा मयत महिलेला घेऊन कोणीही घराबाहेर पडलं नाही तेव्हा मुस्लिम समाजातील लोकांनी मृत महिलेच्या मुलाकडे मदत मागितली. मुलाने नकार देताच , मुस्लिम समुदायाचे मो. रफिक, मो कलाम, मो ललित, मो लादेन आणि मो शरीक पुढे आले. आधी तिरडी बांधण्यात आली आणि मग त्यांनी या वृद्ध महिलेची अंघोळ केली  आणि हिंदू प्रथांनुसार अंतिम संस्कार केले.

मो. रफिक म्हणाले की, ''एखाद्याने धर्माच्या आधारे भेदभाव करू नये. मानवांनी मानवासाठी उपयोगी पडावे, आम्हीही तेच केले. महिलेच्या मृत्यूनंतर अशी अवस्था झाली की लोकांनी त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले. प्रत्येकाला वाटले की बाई कोरोनामुळे मरण पावली आहे. म्हणून कोणीही त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आले नाही. त्यानंतर महिलेच्या इतर नातेवाईकांना विचारात घेऊन आम्ही तयारी करायला सुरूवात केली.''

हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव

 मृत्यूनंतर आपल्याच लोकांना खांदा देण्याचीही परवानगी प्रशासन देत नाहीये. अशा दुर्दैवी परिस्थितीत औरंगाबाद शहरातून मानवतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला. या घटनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

खांद्यावर मृतदेह घेणारे दाढी, टोपी आणि रूमाल ठेवलेले हे चेहरे सिनेमातील सीन नाही. औरंगाबादमधील हे सत्य चित्र आहे. औरंगाबादच्या सिटी चौक सराफा भागात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोध याची ही अंत्ययात्रा आहे. कैलाश नगरच्या स्मशानभूमीत १५ वर्षीय सुबोधला अग्नि देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन केली.

 आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

सुबोध हा जन्मताच दिव्यांग होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. पण ते मुलाला वाचवू शकले नाहीत. सुबोधच्या मृत्यूची बातमी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना समजली तर त्यांनी सुबोधच्या अंत्यसंस्काराची पूर्ण व्यवस्था केली. इतकेच नाही तर सर्व जबाबदारी त्यांनीच पार पाडली. पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सुबोधला स्मशानभूमीत घेऊन गेले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाMuslimमुस्लीमHinduहिंदूBiharबिहार