शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलच! रेल्वेतील १६८ उंदीर पकडण्यासाठी ६९ लाख रुपये खर्च; वाचा नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 15:39 IST

रेल्वेने तीन वर्षात ६९ लाख रुपये खर्च केले आहेत.

उत्तर रेल्वेने उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. अनेक अहवालांतून या संदर्भातून माहिती समोर आली. रेल्वेने उंदीर पकडण्यासाठी ४१ हजार रुपये खर्च केले आहेत आणि त्याचप्रमाणे ३ वर्षांत ६९ लाख रुपये खर्च केले आहेत, असं या अहवालात म्हटले आहे.

आधी हाणामारी, नंतर डान्स; WWE च्या सुपरस्टार्सना 'नाटू-नाटू'ची भुरळ, पाहा VIDEO

उंदरांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उत्तर रेल्वेने एका वर्षात उंदीर पकडण्यासाठी २३.२ लाख रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. आता लखनौ मंडळाने यावर प्रतिक्रिया देत या आरोपाचे खंडन केले आहे.

एका वृत्तानुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, माहिती चुकीची मांडण्यात आली आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणात स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. ही माहिती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रेल्वेने दिलेली माहिती अशी, लखनौ विभागातील कीटक आणि उंदीर नियंत्रित करण्याची जबाबदारी गोमतीनगर येथील मेसर्स सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनची आहे. हा भारत सरकारचा उपक्रम आहे. कीटक आणि उंदीर नियंत्रित करणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये फ्लशिंग, फवारणी, स्टेबलिंग आणि देखभाल, झुरळांसारख्या कीटकांपासून रेल्वे मार्गांचे संरक्षण करणे आणि रेल्वेच्या बोगीमध्ये उंदरांना प्रवेश करण्यापासून रोखणे यांचा समावेश आहे.

यात उंदीर पकडणे नाही, तर उंदीर वाढण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे रेल्वेने सांगितले. उंदीर आणि झुरळांपासून बचाव करण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारणीपासून ते गाड्यांच्या बोगीमध्ये अनेक प्रकारची कामे केली जातात. लखनौ मंडळाने आक्षेप नोंदवला असून एका उंदरावर ४१ हजार रुपये खर्च केल्याची बाब चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.

उंदीर पकडण्यासाठी रेल्वेने दरवर्षी २३.२ लाख रुपये खर्च केल्याचे अहवालात म्हटले आहे. तीन वर्षांत ६९ लाख रुपये खर्च करून फक्त १६८ उंदीर पकडली आहेत. २५ हजार डब्यातील उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रति बोगी ९४ रुपये खर्च झाल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.

खासदार आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्याकडून ही माहिती मागवली होती. रेल्वेने दिल्ली, अंबाला, लखनौ, फिरोजपूर आणि मुरादाबाद या पाच विभागांकडून माहिती मागवली होती, त्यापैकी फक्त लखनौ विभागाने प्रतिसाद दिला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेrailwayरेल्वे