काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का लावलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:10 IST2025-06-07T15:07:03+5:302025-06-07T15:10:02+5:30

Knowledge News: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

Interesting Facts : Why do many Indian cities have pur or bad in their names | काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का लावलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत कारण...

काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का लावलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत कारण...

Knowledge News: भारतातील शहरं जेवढे विविधतेने नटलेले आहेत, तेवढीच रंजक कहाणी त्यांच्या नावांची सुद्धा आहे. जयपूर, कानपूर, हैद्राबाद, अहमदाबाद या शहरांची नावं तर नक्कीच ऐकली असतील. अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

'पूर' शब्दाचा अर्थ?

सोशल मीडियावरील एका व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, 'पूर' हा शब्द संस्कृतमधून आला आहे. ज्याचा अर्थ 'शहर' किंवा 'नगर' होतो. असं सांगितलं जातं की, राजे महाराजे जेव्हा एखादी वस्ती किंवा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांच्या नावासोबत 'पूर' जोडलं जात होतं. उदाहरणार्थ जयपूर (जय सिंह द्वारे वसवण्यात आलं), उदयपूर (उदय सिंह द्वारे) आणि ग्वालियर (ग्वालिपूर) ही नावं हीच परंपरा दर्शवतात. असं सांगण्यात येतं की, 'पूर' कधी कधी 'किल्ला' या संदर्भातही वापरलं जात होतं.

भाषेचे तज्ज्ञ सांगतात की, 'पूर' शब्दाचा प्रयोग वैदिक काळापासून होत आला आहे आणि ऋग्वेदातही याचा उल्लेख आढळतो. उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात सुद्धा हा शब्द प्रचलित आहे. जसे की, तिरूपूर आणि काशीपूर.

'बाद' शब्द कुठून आला?

व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, 'बाद' मूळचा फारसीमधून आला आहे आणि तो 'आबाद' पासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो 'वसवण्यात आलेलं ठिकाण' किंवा 'विकसीत वस्ती'. हा शब्द भारतात मुघलांच्या काळात जास्त लोकप्रिय झाला.  त्यावेळी फाससी भाषा प्रशासन आणि संस्कृतीचा भाग बनली होती. हैदराबाद (हैदर अलीच्या नावावर) आणि अहमदाबाद (अहमद शाह द्वारे वसवण्यात आलं). अनेकदा अशा शहरांच्या नावात शेवटी 'बाद' शब्द येतो. कारण ही शहरं पाण्याच्या स्त्रोतांजवळ वसवण्यात आले होते. जे शेती आणि जीवनासाठी आवश्यक आहे. 

Web Title: Interesting Facts : Why do many Indian cities have pur or bad in their names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.