शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

भीषण परिस्थिती! कोरडा दुष्काळ, वाटीभर पाण्यासाठी रांगा; अंगावर काटा आणणारे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 13:16 IST

दिल्लीसारख्या शहरात देखील पाण्याची कमतरता जाणवत आहे.

देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले, तरी अद्याप अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. राज्यातील ग्रामीण भागातही भीषण परिस्थिती आहे. दिल्लीसारख्या शहरात देखील पाण्याची कमतरता जाणवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ दिल्लीत काय परिस्थिती आहे हे दाखवतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाटीभर पाण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे देशातील बहुतांश भागाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला.

पुण्यासारख्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाणी रस्त्यावर तुंबत असून, शहरातील काही भागांना नदी-नाल्याचे स्वरूप आले. पण, ग्रामीण भागात आजही कोरडा दुष्काळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण-खटाव परिसरातील लोकांसाठी हा संघर्ष नवा नाही. पण, दरवर्षीच्या तुलनेत यावेळी त्यांना यंदा पाण्यासाठी खूपच वणवण फिरावे लागले. येथील अनेक गावांमध्ये चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. 

अंगावर काटा आणणारे दृश्य 

हे सोशल मीडियाचे जग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये लोक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. याशिवाय वाटीभर पाण्यासाठी किती संघर्ष करत आहेत हे व्हिडीओतून स्पष्ट होते. 

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ समुद्राजवळील असल्याचा कळते. वाळूत छोटे-छोटे खड्डे खोदून लोक वाटीभर पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एक हंडा अथवा एक भांडे भरायला लागणारा वेळ आणि त्यासाठी असलेली भली मोठी रांग भीषण परिस्थितीचा अंदाज देते. 

पाण्यासाठी संघर्ष करत असलेल्या लोकांना पाहून नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. कमेंटच्या माध्यमातून लोक यावर व्यक्त होत आहेत. "जल से ही कल है", "जल ही जीवन है" , अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीdroughtदुष्काळSocial Viralसोशल व्हायरल