शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन वर्षे बंद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:20 IST

Sawantwadi sindhudurg Zp- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्षे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ६ कर्मचारी शासकीय नियमांनुसार वय पूर्ण होऊनही या भरतीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, सावंतवाडी शाखेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषणप्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेने गेली दोन वर्षे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ६ कर्मचारी शासकीय नियमांनुसार वय पूर्ण होऊनही या भरतीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, सावंतवाडी शाखेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.जिल्हा परिषदमध्ये दरवर्षी रिक्त असलेल्या एकूण जागांपैकी १० टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरली जातात. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सेवेत रूजू झाल्यानंतर सलग दहा वर्षे सेवा बजावलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी हे सरळ भरतीने रिक्त पदांच्या १० टक्के नियुक्ती देतात.

शिपाई, सफाईगार, पाणीपुरवठा कर्मचारी व लिपिकांनाही संधी मिळते. वर्ग ३ व वर्ग ४ या पदांवर पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ही नियुक्ती देण्यात येते; परंतु २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांत ही भरती जिल्हा परिषदेने केली नाही. २०१८-१९ मध्ये भरती केली. परंतु जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या तिघांना नियुक्ती देण्यात आली. परंतु यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नव्हते.जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. यावेळी तालुका सचिव अशोक जाधव, गुरूदास घाडी, राजन नाईक, महेश सावंत, गोविंद जाधव, वैशाली नाईक, रामचंद्र दळवी आदी उपस्थित होते.एका अधिकाऱ्याकडून सीईओंची दिशाभूलकर्मचारी संघटनेने २ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडले होते. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी याबाबत चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्हा परिषद सामान्य विभागातील एक अधिकारी याबाबत चुकीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देत आहे. २०१८-१९ मध्ये ही भरती राबविल्याचे सांगत आहे.परंतु याबाबत प्रत्यक्षात प्रक्रिया राबविली गेली नाही. यावर्षी केवळ जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यातून जिल्हा परिषद भरती न झाल्याची माहिती मिळाली. संबंधित अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले आहे, असे यावेळी तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी सांगितले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद