शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन वर्षे बंद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:20 IST

Sawantwadi sindhudurg Zp- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्षे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ६ कर्मचारी शासकीय नियमांनुसार वय पूर्ण होऊनही या भरतीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, सावंतवाडी शाखेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषणप्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेने गेली दोन वर्षे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ६ कर्मचारी शासकीय नियमांनुसार वय पूर्ण होऊनही या भरतीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, सावंतवाडी शाखेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.जिल्हा परिषदमध्ये दरवर्षी रिक्त असलेल्या एकूण जागांपैकी १० टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरली जातात. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सेवेत रूजू झाल्यानंतर सलग दहा वर्षे सेवा बजावलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी हे सरळ भरतीने रिक्त पदांच्या १० टक्के नियुक्ती देतात.

शिपाई, सफाईगार, पाणीपुरवठा कर्मचारी व लिपिकांनाही संधी मिळते. वर्ग ३ व वर्ग ४ या पदांवर पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ही नियुक्ती देण्यात येते; परंतु २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांत ही भरती जिल्हा परिषदेने केली नाही. २०१८-१९ मध्ये भरती केली. परंतु जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या तिघांना नियुक्ती देण्यात आली. परंतु यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नव्हते.जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. यावेळी तालुका सचिव अशोक जाधव, गुरूदास घाडी, राजन नाईक, महेश सावंत, गोविंद जाधव, वैशाली नाईक, रामचंद्र दळवी आदी उपस्थित होते.एका अधिकाऱ्याकडून सीईओंची दिशाभूलकर्मचारी संघटनेने २ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडले होते. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी याबाबत चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्हा परिषद सामान्य विभागातील एक अधिकारी याबाबत चुकीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देत आहे. २०१८-१९ मध्ये ही भरती राबविल्याचे सांगत आहे.परंतु याबाबत प्रत्यक्षात प्रक्रिया राबविली गेली नाही. यावर्षी केवळ जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यातून जिल्हा परिषद भरती न झाल्याची माहिती मिळाली. संबंधित अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले आहे, असे यावेळी तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी सांगितले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद