शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सिंधुदुर्ग : कणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:11 IST

प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली.

ठळक मुद्देकणकवलीतील चौपदरीकरणाचे काम सर्व सम्मतीनेच : नितेश राणेकणकवली प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यांवर यशस्वी तोडगा भाजी, विक्रेते, स्टॉल धारकांचे होणार पुर्नवसन

कणकवली : कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी लढा सुरू होता़. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज स्वरूपात मदत द्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार आ़मदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ़. दिलीप पांढरपट्टे यांच्या दालनात यशस्वी बैठक झाली आहे.

येत्या दोन दिवसात महत्वपूर्ण बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला व भाडेकरूंना मोबदला देण्यात येईल.निवाडा धारकांच्या खात्यावर मोबदला जमा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती अ‍ॅड़ उमेश सावंत यांनी दिली़. तर प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आ़मदार नितेश राणे यांच्या उपस्थिती प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली़ . यावेळी अ‍ॅड़ उमेश सावंत, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर, अनिल शेटये, बाळा बांदेकर, सुशिल पारकर, माधव शिरसाट व प्रकल्पग्रस्त, स्टॉल धारक, भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी दालनात झालेल्या अंतीम चर्चेबाबत आ़मदार नितेश राणे यांनी माहिती दिली़. त्यामध्ये हॉटेल सह्याद्री ते मुख्यचौकापर्यंत दिवाळी असल्याने कोणतीही कारवाई होणार नाही. भाडेकरूंनी आपले बॅलन्सशिट व मालकाचे सम्मतीपत्र सादर केल्यानंतर त्याना मोबदला देण्यात येईल. कणकवलीला विकसीत करताना कोणाच्या पोटावर पाय येणार नाहीत, याची काळजी प्रशासन घेत आहे. जे दावे दाखल झाले आहेत ते दावे येत्या आठ दिवसात निकाली काढण्यात येतील. त्यामुळे सर्वांच्याच सम्मतीने कणकवलीत महामार्गाचे काम करण्यासाठी परवानगी असल्याचे आ़मदार नितेश राणे यांनी या बैठकीत स्पष्ठ केले.या बैठकीत भाजी विक्रेते, फळ विक्रेते व स्टॉल धारक यांच्यावतीने सुदीप कांबळे यांनी पुर्नवसन करण्याबाबत मागणी केली. तसेच २०१३ च्या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचा उदरनिर्वाह बुडणार आहे. त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून भरपाई मिळावी, अशी भूमिका मांडली. तर त्या मुद्यावर अ‍ॅड. उमेश सावंत यांनी हे महामार्ग भूसंपादन सक्तीच्या पध्दतीने होत आहे़. त्यामुळे जे बेकायदेशीर व्यवसाय करत असतील त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही़.भाजी विक्रेते, स्टॉल धारकांचे होणार पुर्नवसन !कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून महामार्गावर आपली उपजिवीका चालवत असलेल्या स्टॉल धारक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते अन्य छोट्या व्यापाऱ्यांचे पुर्नवसन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत. त्यामुळे कोणाच्याही पोटावर लाथ बसणार नाही. हे काम विकासासाठी करणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने नगरपंचायतमध्ये लवकरच बैठक आयोजित करून जागा देण्यात येईल, असे आश्वासन आ़मदार नितेश राणे यांनी दिले.आश्वासने न पाळल्यास काम अडवू !कणकवलीत प्रकल्पग्रस्त, विविध पक्षाचे नेते आणि आम्ही सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे समाधान झाले आहे. अनेकदा काम अडवून प्रशासनाला आमच्या मागण्या मान्य करायला आम्ही भाग पाडले आहे़. दिलेल्या आश्वासनांवर ठोस कार्यवाही करण्याचा शब्द जिल्हाधिकारी डॉ़ . दिलीप पांढरपट्टे यांनी मंगळवारी बैठकीत दिला आहे़. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर प्रशासनाने शब्द पाळला नाही तर पुन्हा काम अडवू असा इशारा आ़मदार नितेश राणे यांनी दिला.प्रकल्पग्रस्त राणेंचे ऋणी !प्रकल्पग्रस्तांची भूमिका घेऊन आ़मदार नितेश राणे आमच्या सोबत लढा देत होते़. खा़सदार नारायण राणे व विविध पक्षाचे नेते यांनी देखील या आमच्या लढ्यात अथक परिश्रम घेतले. इतर पक्षाच्या नेत्यानिहि प्रयत्न केले. त्यामुळेच कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करून विस्थापितांचे पुर्नवसन करून द्यावे, अशी भावना उदय वरवडेकर यांनी या बैठकीत व्यक्त केली. 

टॅग्स :highwayमहामार्गNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील