शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण टीका करणाऱ्यांना सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना सज्जड दम

By सुधीर राणे | Updated: November 26, 2022 18:29 IST

शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही

कणकवली: रिफायनरी प्रकल्प, सीवर्ल्ड किंवा कोकणात येणाऱ्या सर्व उद्योगांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जातो. मात्र, त्यानंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी तोडपाणी केली जाते. एन्रॉनबाबतही शिवसेनेने तोडपाणी केली होती. असा आरोप करतानाच आम्ही जनतेची विकास कामे करतो. उगाचच टीका कोणावर करीत नाही.त्यामुळे यापुढे महाराष्ट्र ते दिल्ली पर्यंतच्या भाजप नेत्यांवर कोणी विनाकारण टीका करेल तर त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर जाऊ देणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार नीतेश राणे , जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी उपस्थित होते.शिवसेना मातोश्री पुरतीचयावेळी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. शिवसेना आता मातोश्री पुरतीच मर्यादीत राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कुठेही दौरे केले तरी शिवसेना पक्ष वाढणार नाही. महाराष्ट्र बंद करेन, बाकी काय बोलणार? उद्धव ठाकरे यांच्या जवळ कोण आहे ? त्यांचे 'पिल्लू' टीका करीत असून दिशा सालीयन प्रकरणातून तो सुटणार नाही. जनतेला विकास पाहिजे असेल तर टोल द्यावा लागेल. त्याशिवाय विकासकामांना निधी कसा मिळणार? सी वर्ल्ड प्रकल्प आम्ही आणणार आहोत. विनायक राऊत यांनी त्याला विरोध केला. मात्र आता सत्ता आमची असून आम्ही तो प्रकल्प आणू.भारत जोडो यात्रेच्या वेळी भाजपवर टीका केली गेली. त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. देशात, राज्यात बरीच वर्षे काँगेसची सत्ता होती. त्यांनी काय केले? टाळबा, महंम्मदवाडी, तिलारी प्रकल्प लवकरच पूर्ण होतील. काही तांत्रिक बाबी तसेच जमिनीचा प्रश्न आहे. तो सोडविला जाईल. धरण आणि केटी बंधारे यातील फरक वैभव नाईक यांना माहीत नाही. त्यामुळे ते मोठे धरण नको असे म्हणतात. वि.स.खांडेकर यांची जमीन त्यांच्या वारसांना निश्चित मिळवून देऊ. मात्र, त्यांच्यापैकी कोणी तरी नेमकी काय समस्या आहे, ते आमच्यासमोर मांडले पाहिजे. रोजगार देणारा प्रकल्प होत असेल तर आमचा त्याला  पाठींबाच असेल.सीमाप्रश्नासाठी राष्ट्रवादीने काय केले?महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी अजित पवार यांनी काय कार्य केले आहे? त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाबाबत काय केले? ते आधी सांगावे. त्यामुळे त्यांना या विषयाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार  नाही. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार येथील एक इंचही जमीन कोणाला  देणार नाही. या प्रश्नासाठी पहिले आंदोलन झाले. त्यात मी सहभागी झालो होतो. राज्याच्या जनतेला सुख समाधान मिळावे, यासाठी देवीच्या चरणी मागणे मागण्यासाठी शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेले आहेत.तर त्यात काय वाईट आहे? असेही राणे म्हणाले.ग्रामपंचायत निवडणुकीतील युतीचा निर्णय पक्ष पातळीवर होणारआगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत भाजपाने युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठ वर्षात जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपने राज्यात २०० जागा जिंकाव्यात असा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.अंधारे ताईला भरपूर प्रसिद्धी मिळालीयापूर्वी सिंधुदुर्गात चाकरमानी फेब्रुवारी महिन्यात येत नसायचे, कारण पाण्याची मोठी समस्या असायची. कोणामुळे येथील रस्ते झाले? शिक्षणविषयक सुविधा, टँकर मुक्त जिल्हा कोणामुळे झाला? हे जाणून घ्या. मात्र, त्याचे कौतुक कोणी करीत नाही. याउलट जिल्ह्यात येऊन आमच्यावर विनाकारण टीका करणाऱ्या त्या ताईला भरपूर प्रसिद्धी मिळाली असा टोला प्रा.सुषमा अंधारे यांचे नाव न घेता नारायण राणे यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSushma Andhareसुषमा अंधारे