शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे-राज ठाकरे एकत्र येणार? एकच चर्चा मनसेच्या आंदोलनाला राणेंचा पाठिंबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 05:20 IST

कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मालवण : कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणे आणि राज ठाकरे हे दोन नेते आगामी काळात एकत्र येणार का, याचीच चर्चा कोकणात सुरू झाली आहे.मालवण येथील दैवज्ञ भवन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून मी यशस्वी झालो, मात्र सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो तरी मागच्यावेळी यशस्वी होऊ शकलो नाही, ही दु:खाची बाब आहे. मागील निवडणुकीत वैभव नाईक यांनी केलेला पराभव मी विसरू शकत नाही.१९९० पासून मला ८० टक्केच्यावर मताधिक्य मिळायचे. मात्र लोकसभा निवडणुकीत मताधिक्याची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून मतांची ८० टक्के मतांची तजविज करावी, असे आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीतआत्मचरित्राचे प्रकाशननारायण राणे यांच्या आत्मचरित्राचे १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन होणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ न दिल्यामुळे हे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarayan Raneनारायण राणे