शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

..तेव्हा राजीनामा का दिला नाही?; मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल 

By सुधीर राणे | Updated: November 1, 2023 14:05 IST

जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला!

कणकवली: उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले. तेव्हा नैतिकता पाळून त्यांनी राजीनामा का दिला नाही? राजीनामा देण्याची प्रथम त्यांनी आपल्या घरातून सुरवात करावी. त्यांच्या पक्षातील खासदार,आमदार यांचे राजीनामे घ्यावेत. मगच दुसऱ्यांना राजीनामा द्यायला त्यांनी सांगावा. तशी हिम्मत उद्धव ठाकरे यांनी दाखवावी. असे आव्हान  आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. कणकवली येथे बुधवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे  म्हणाले, संजय राऊत हे एका बाजूला राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजुला सरकारच्या बैठकीला यायची त्यांची इच्छा आहे. आजच्या बैठकीला त्यांना बोलावले नाही. त्याबद्धल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो.आमचे सरकार टिकणारे आरक्षण देणार आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी राजकीय भाषा सुरू केली आहे.त्यांना जो कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे, त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गाल बोट लावू नये.  हिंसेचे समर्थन करू नये, जाळपोळ करत असतील तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये. जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. याची आम्ही खात्री देतो. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचे चिन्ह, नाव आहे का? त्यामुळे चिरीमिरी लोकांना, दंगल भडकवणाऱ्यांना सर्वपक्षीय बैठकीला बोलावले नाही.असे सांगताना अंबादास दानवेना बोलावले होते. ते तुमच्या पक्षाचे नाहीत का ?याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.मातोश्रीचे पण इंटरनेट बंद करावे. तिथूनच दंगली भडकविल्या जातात.असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. तसेच शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद करावे लागते. मात्र, सरपंच पदाची कधी निवडणूक लढविली नाही, त्याना राज्य कसे चालवावे हे समजणार नाही.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला!माझी किंमत भाजपला माहीत आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलायचे बंद करावे.हा माझा त्यांना मैत्रीचा सल्ला आहे. आमदारांची घरे ,गाड्या फोडणारे मराठा समाजातील नाहीत. ते ठाकरे व पवारांचे हस्तक आहेत.प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याचे उत्तर राऊत यांनी द्यावे.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे