शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

सत्तेत राहून सेनेने मच्छिमारांसाठी काय केले? : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:26 IST

शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील अनधिकृत बैठका उधळणार; केवळ मतांसाठी मच्छिमार

कणकवली : शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे. केवळ मत्स्यमंत्र्यांना निवेदन देऊन पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मच्छिमारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न वैभव नाईक करीत असल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक काय असतो? याचे उदाहरण म्हणजे मच्छिमारांचा प्रश्न आहे. २०१४ मध्ये विरोधात असलेल्या शिवसेनेने सत्तेत येण्यासाठी सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील मच्छिमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. मच्छिमारांचे प्रश्न तत्कालीन मंत्री असलेले नारायण राणे व त्यांचे सत्तेतील सहकारी सोडवू शकले नाहीत असे सांगून मच्छिमारांमध्ये विरोधाचे वातावरण तयार केले. पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देणार, अनधिकृत मच्छिमारी बंद करणार, डिझेल परतावा मिळवून देणार, मच्छिमारांसाठी संरक्षण कायदा करणार यासह विविध प्रश्नांबाबत आश्वासने देत मच्छिमारांची मते शिवसेनेने मिळविली.

मग त्यानंतरच्या ५ वर्षांत सत्तेत असलेल्या शिवसेनेने मच्छिमारांची परिस्थिती बदलली का? असा सवाल करतानाच आमदार वैभव नाईक यांनी विरोधी पक्षातील आमदारांप्रमाणे मंत्र्यांना निवेदन देऊन मच्छिमारांची दिशाभूल करू नये. कारण, जानेवारी २०१८ मध्ये मच्छिमारांच्या १० प्रश्नांवर मंत्री जानकर यांना मीदेखील निवेदन दिले होते. मात्र त्याची जाहिरातबाजी केली नव्हती, असा उपरोधिक टोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला.मच्छिमारांची मते मिळवून सत्ता मिळविली, आम्हांला सत्ता द्या. तुम्हांला न्याय मिळवून देऊ असा शिवसेनेने प्रचार केला. मत्स्य खात्याचे राज्यमंत्री शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत तर आमदार वैभव नाईक अशी शिवसेनेची मंडळी सत्तेत असूनदेखील मच्छिमारांना त्याचा काय फायदा झाला? केवळ मच्छिमारांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम वैभव नाईक करीत आहेत.

मच्छिमारांच्या संरक्षणासाठी अद्यापही गस्तीनौका मत्स्य आयुक्तांकडे नाहीत. मच्छिमारांना शिवसेना सत्तेत राहून न्याय देऊ शकली नाही. त्याविरोधात देवगडमधील मच्छिमार २ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांना भेटले आहेत. तसे निवेदन सादर करून येत्या आठ दिवसांत मच्छिमारांचे प्रश्न सुटले नाहीत तर सरकारला जिल्ह्यातील मच्छिमार जाब विचारणार आहेत. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी मच्छिमारांची असून आम्ही सरकारच्या विरोधात मच्छिमारांच्या बाजूने आवाज उठवू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला.शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग!शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बसून सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. सत्तेचा दबाव टाकून काही अनधिकृत बैठका जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेतल्या जात आहेत. पक्षीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपयोग शिवसेनेची नेतेमंडळी करीत आहेत. जिल्हाधिकाºयांना माहिती नसलेली बैठक आयोजित केली जाते. ही सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आहे. असाच प्रकार वाघोटण गावातील एका विषयासंदर्भात झाला आहे. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने बैठकीचे आयोजन केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात मी जिल्हाधिकाºयांशी बोलल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांचे पितळ उघडे पडले असून काही बैठका रद्द करण्यात आल्या. या पुढील काळात शिवसेनेच्या नेत्यांकडून सत्तेचा दुरुपयोग करत दबावासाठी बैठका लावल्यास त्या उधळून लावल्या जातील असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला .

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग