शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्तेत राहून सेनेने मच्छिमारांसाठी काय केले? : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:26 IST

शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील अनधिकृत बैठका उधळणार; केवळ मतांसाठी मच्छिमार

कणकवली : शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकांमध्ये राणेंच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून मच्छिमारांवर अन्याय केल्याचा प्रचार केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मच्छिमारांचे प्रश्न आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी किती सोडविले? हे त्यांनी जाहीर करावे. केवळ मत्स्यमंत्र्यांना निवेदन देऊन पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मच्छिमारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न वैभव नाईक करीत असल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक काय असतो? याचे उदाहरण म्हणजे मच्छिमारांचा प्रश्न आहे. २०१४ मध्ये विरोधात असलेल्या शिवसेनेने सत्तेत येण्यासाठी सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील मच्छिमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. मच्छिमारांचे प्रश्न तत्कालीन मंत्री असलेले नारायण राणे व त्यांचे सत्तेतील सहकारी सोडवू शकले नाहीत असे सांगून मच्छिमारांमध्ये विरोधाचे वातावरण तयार केले. पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देणार, अनधिकृत मच्छिमारी बंद करणार, डिझेल परतावा मिळवून देणार, मच्छिमारांसाठी संरक्षण कायदा करणार यासह विविध प्रश्नांबाबत आश्वासने देत मच्छिमारांची मते शिवसेनेने मिळविली.

मग त्यानंतरच्या ५ वर्षांत सत्तेत असलेल्या शिवसेनेने मच्छिमारांची परिस्थिती बदलली का? असा सवाल करतानाच आमदार वैभव नाईक यांनी विरोधी पक्षातील आमदारांप्रमाणे मंत्र्यांना निवेदन देऊन मच्छिमारांची दिशाभूल करू नये. कारण, जानेवारी २०१८ मध्ये मच्छिमारांच्या १० प्रश्नांवर मंत्री जानकर यांना मीदेखील निवेदन दिले होते. मात्र त्याची जाहिरातबाजी केली नव्हती, असा उपरोधिक टोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला.मच्छिमारांची मते मिळवून सत्ता मिळविली, आम्हांला सत्ता द्या. तुम्हांला न्याय मिळवून देऊ असा शिवसेनेने प्रचार केला. मत्स्य खात्याचे राज्यमंत्री शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत तर आमदार वैभव नाईक अशी शिवसेनेची मंडळी सत्तेत असूनदेखील मच्छिमारांना त्याचा काय फायदा झाला? केवळ मच्छिमारांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम वैभव नाईक करीत आहेत.

मच्छिमारांच्या संरक्षणासाठी अद्यापही गस्तीनौका मत्स्य आयुक्तांकडे नाहीत. मच्छिमारांना शिवसेना सत्तेत राहून न्याय देऊ शकली नाही. त्याविरोधात देवगडमधील मच्छिमार २ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांना भेटले आहेत. तसे निवेदन सादर करून येत्या आठ दिवसांत मच्छिमारांचे प्रश्न सुटले नाहीत तर सरकारला जिल्ह्यातील मच्छिमार जाब विचारणार आहेत. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी मच्छिमारांची असून आम्ही सरकारच्या विरोधात मच्छिमारांच्या बाजूने आवाज उठवू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला.शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग!शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बसून सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. सत्तेचा दबाव टाकून काही अनधिकृत बैठका जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेतल्या जात आहेत. पक्षीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपयोग शिवसेनेची नेतेमंडळी करीत आहेत. जिल्हाधिकाºयांना माहिती नसलेली बैठक आयोजित केली जाते. ही सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आहे. असाच प्रकार वाघोटण गावातील एका विषयासंदर्भात झाला आहे. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने बैठकीचे आयोजन केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात मी जिल्हाधिकाºयांशी बोलल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांचे पितळ उघडे पडले असून काही बैठका रद्द करण्यात आल्या. या पुढील काळात शिवसेनेच्या नेत्यांकडून सत्तेचा दुरुपयोग करत दबावासाठी बैठका लावल्यास त्या उधळून लावल्या जातील असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला .

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग