शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
4
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
5
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
6
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
7
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
8
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
9
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
10
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
11
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
12
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
13
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
14
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
15
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
16
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
17
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
18
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
19
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
20
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

दिव्यांग, अपंगांबाबतच्या निर्णयाचे स्वागत

By admin | Updated: January 15, 2016 00:22 IST

राज्य शासनाकडून अंमलबजावणी : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिथीलता

सिंधुदुर्गनगरी : विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग/अपंग) विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सोयी सवलती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या युती शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी निर्धारीत वेळेपेक्षा २० मिनिटे अधिक वेळ, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत यासह विविध सुविधा शासनाने दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) म्हणजे अंशत: अंध अथवा पूर्णत: अंध, मतिमंद, कर्णबधीर, अस्थिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सरेब्रेल पाल्सी, अध्ययन अक्षम अशा सर्व विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत शिक्षण सर्वच गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये मूल्यमापन होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या ज्ञानाच्या, भाषेच्या मूल्यमापनाच्या पद्धती सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असणे अपेक्षित आहे. या दिव्यांग विद्यार्थ्यांना असलेल्या परीक्षा योजनेपेक्षा परीक्षा पद्धतीमध्ये काही सोयी सवलती देणे आवश्यक होते. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते आठवीकरीता सर्व शिक्षा अभियान व नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर सुरु करण्यात आलेले आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यमापनामध्ये गरजेनुसार सोयी सवलती देण्याबाबत शासन स्तरावरून समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार भाजप व सेनेच्या युती शासनाने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष सवलत दिली आहे. त्यानुसार कॅटेगरीनुसार शासनाने शैक्षणिक सवलतीचे निकष जारी केले आहेत. (प्रतिनिधी)अंध विद्यार्थ्यांकरीता सवलतीपेपर सोडविण्यासाठी प्रति तास २० मिनिटे अधिक वेळ देय राहीलनापास होणाऱ्या विद्यार्थ्याला कमाल ३० गुणांची सवलतआकृत्या, नकाशे काढण्याची सवलतविज्ञान व तंत्रज्ञान या प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा देता येईल.यासह १९ सवलती देण्यात आल्या आहेत.कर्णबधीर विद्यार्थ्यांकरीता सवलतीप्रति तास ३० मिनिटे पेपर सोडविण्यासाठी जादा दिली जातील.मौखिक मूल्य मापनासाठी लेखीचा पर्याय असावा.मुलांसाठी स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येवू नये.अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी सवलतीसोयीनुसार नजीकचे परीक्षा केंद्रपेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे२० गुणांची सवलतहातात दोष असल्यास या विद्यार्थ्यांना लेखनिक घेता येईल.बहुविकलांग विद्यार्थ्यांकरीता सवलती२० मिनिटे अधिक वेळ व २० गुणांची सवलत.लेखनिक घेण्यास परवानगी.यासह वरील नमूद केलेल्या आजारांवर शैक्षणिक सुविधांची सूट देण्यात आली आहे.