शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

दिव्यांग, अपंगांबाबतच्या निर्णयाचे स्वागत

By admin | Updated: January 15, 2016 00:22 IST

राज्य शासनाकडून अंमलबजावणी : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिथीलता

सिंधुदुर्गनगरी : विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग/अपंग) विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सोयी सवलती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या युती शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी निर्धारीत वेळेपेक्षा २० मिनिटे अधिक वेळ, अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल २० गुणांची सवलत यासह विविध सुविधा शासनाने दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) म्हणजे अंशत: अंध अथवा पूर्णत: अंध, मतिमंद, कर्णबधीर, अस्थिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सरेब्रेल पाल्सी, अध्ययन अक्षम अशा सर्व विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत शिक्षण सर्वच गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये मूल्यमापन होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या ज्ञानाच्या, भाषेच्या मूल्यमापनाच्या पद्धती सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असणे अपेक्षित आहे. या दिव्यांग विद्यार्थ्यांना असलेल्या परीक्षा योजनेपेक्षा परीक्षा पद्धतीमध्ये काही सोयी सवलती देणे आवश्यक होते. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते आठवीकरीता सर्व शिक्षा अभियान व नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर सुरु करण्यात आलेले आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यमापनामध्ये गरजेनुसार सोयी सवलती देण्याबाबत शासन स्तरावरून समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार भाजप व सेनेच्या युती शासनाने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष सवलत दिली आहे. त्यानुसार कॅटेगरीनुसार शासनाने शैक्षणिक सवलतीचे निकष जारी केले आहेत. (प्रतिनिधी)अंध विद्यार्थ्यांकरीता सवलतीपेपर सोडविण्यासाठी प्रति तास २० मिनिटे अधिक वेळ देय राहीलनापास होणाऱ्या विद्यार्थ्याला कमाल ३० गुणांची सवलतआकृत्या, नकाशे काढण्याची सवलतविज्ञान व तंत्रज्ञान या प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा देता येईल.यासह १९ सवलती देण्यात आल्या आहेत.कर्णबधीर विद्यार्थ्यांकरीता सवलतीप्रति तास ३० मिनिटे पेपर सोडविण्यासाठी जादा दिली जातील.मौखिक मूल्य मापनासाठी लेखीचा पर्याय असावा.मुलांसाठी स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येवू नये.अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी सवलतीसोयीनुसार नजीकचे परीक्षा केंद्रपेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे२० गुणांची सवलतहातात दोष असल्यास या विद्यार्थ्यांना लेखनिक घेता येईल.बहुविकलांग विद्यार्थ्यांकरीता सवलती२० मिनिटे अधिक वेळ व २० गुणांची सवलत.लेखनिक घेण्यास परवानगी.यासह वरील नमूद केलेल्या आजारांवर शैक्षणिक सुविधांची सूट देण्यात आली आहे.