शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आशिया खंडात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे 'हे' गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 1:05 PM

देश-विदेशातील पर्यटक देतात या गावाला भेट, कोणत आहे 'हे' गाव..

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : आशिया खंडातील सर्वात स्वच्छ असलेल्या मावलीनोंग गावाला सिंधुदुर्ग मुख्यालय पत्रकारांनी भेट दिली. स्वच्छतेत अव्वल असलेले मावलीनोंग हे खेडेगाव मेघालय राज्यातील शिलाँगपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. अवघी पाचशे ते सहाशे लोकांची वस्ती असलेले हे गाव आशिया खंडात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. गावाची स्वच्छता कशी असावी आणि कशी राखावी हे या गावातील ग्रामस्थांकडून शिकावे. म्हणूनच देश-विदेशातून पर्यटक या गावाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत असलेल्या पत्रकारांचा अभ्यास दौरा आसाम, मेघालय येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान मेघालय राज्यातील या सुंदर गावाला पत्रकारांनी भेट देत पाहणी केली. जिल्हा प्रशासनाचे नोडल ऑफिसर म्हणून विलास आरोंदेकर या टीममध्ये सहभागी झाले होते.गावात प्रवेश करताच प्रसन्न वातावरणगावात प्रवेश करताच चहूबाजूला पाहिले तर, प्रसन्न वातावरण दिसून येते. कुठेही कचरा आढळून येत नाही. आशिया खंडात स्वच्छतेत एक नंबर आलेल्या या गावाने स्वच्छतेच्या जोरावरच  देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गावात पर्यटकांची अक्षरश: रिघ लागत आहे. याचा फायदा या गावाने उचलला आहे. स्वच्छतेचे जगभरात या गावाचे नाव झाले आहे. ही संधी साधत त्यांनी पर्यटनाचे मार्केटिंग केले.विविध करांतून उत्पन्न वाढविलेदेश-विदेशातील पर्यटक गावाची स्वच्छता पाहण्यासाठी येतात. या स्वच्छतेतून उत्पन्नही या गावाने उपलब्ध करून दिले आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून प्रत्येकी ४० रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. पार्किंग कर घेतला जातो. तसेच बाथरूमसाठीही पैसे आकारले जातात. यातून त्यांनी आपल्या गावचे उत्पन्न वाढवले आहे. शासनाच्या विविध योजना अगदी प्रामाणिकपणे प्रशासनाच्या सहकार्याने राबविल्या जात असल्याचे सांगितले. एमआरजीएस या योजनेतून गावाचा कायापालट केला. रस्ते, गटार, घराच्या दारासमोर फुलझाडे, आतूनच पाईपलाईन गटार अगदी स्वच्छ होती.बारकाईने स्वच्छता जपलीतेथील ग्रामस्थ घरांवर जास्त पैसे खर्च करत नसल्याचे दिसून आले. घरे अतिशय साध्या पद्धतीची परंतु देखणी.  दोन आणि तीन खोल्यांची घरे आहेत. घरात चुलीही आहेत. मात्र, घराची ठेवण अगदी स्वच्छ आहे. एवढ्या बारकाईने त्यांनी स्वच्छता जपली आहे. प्रत्येक घराच्या समोर डस्टबिन ठेवला आहे. अतिशय साधे परंतु बांबूच्या साहाय्याने तयार केलेले डस्टबिन दिसले. यासाठी वेगळ्या प्रकारे निविदा काढावी लागत नाही. अशा देखण्या व स्वच्छ गावात गेल्याचे समाधान वाटते.या दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, रवी गावडे, बाळ खडपकर, संजय वालावलकर, संदीप गावडे, विनोद दळवी, नंदकुमार आयरे, लवू म्हाडेश्वर, गुरू दळवी, विनोद परब, मनोज वारंग, सतीश हरमलकर, गिरीश परब सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग