शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Sindhudurg: वेंगुर्ला शहराची पाणीटंचाईवर अखेर मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:40 IST

प्रथमेश गुरव वेंगुर्ला  : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच ...

प्रथमेश गुरववेंगुर्ला  : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करून हॉटेल व्यावसायिकांमध्ये जाणवत होता. परंतु, पाणीटंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर वेंगुर्ला शहर पाणीटंचाईमुक्त झाले आहे. गतवर्षीपासून शहरात पाणीटंचाई भासत नसल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.गेली काही वर्षे वेंगुर्ला शहर पाणी टंचाईच्या संकटात सापडले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी याचा ताळमेळ साधणे म्हणजे प्रशासनाला एकप्रकारची डोकेदुखी ठरली होती. पाऊस पडेपर्यंत सर्वांना पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणी कपात करणे गरजेचे बनले होते. त्यामुळे सुरुवातीला एक दिवस आड, त्यानंतर दोन दिवस तर पाऊस लांबणीवर जात असल्याचे लक्षात येताच तीन दिवस आड पाणीपुरवठा केला जायचा. पर्यटनाच्यादृष्टीने पाणी टंचाईच्या संकटावर मात करणे गरजेचे होते. दरम्यान, निशाण तलावाची अडीच मीटरने वाढवलेली उंची पाणीटंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली.तलावाची उंची वाढविल्याने जास्त प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक राहिला. त्याचबरोबरच पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइन बदलण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाइपलाइनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाइपलाइनवरचे व्हाॅल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे २०१७ पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून १ लाख लिटर पाण्याची टाकी व चंद्रभागा विहीर आदी कामे मंजूर करून ती पूर्णत्वासही नेली.

नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानसभविष्यात नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस असून यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी शासनस्तरावर केली आहे. तर शहरातील दाभोली नाक्यापर्यंत आलेले तिलारीचे पाणी निमुजगा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या सर्व उपायांना यश आल्यास शहरात मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

नवीन विंधन विहीर बांधलीअग्निशमन केंद्राजवळ २ लाख लिटर पाण्याची टाकी व विहीर, गाडीअड्डा येथील ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नवीन विंधन विहीर बांधण्यात आली.  नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविली. आनंदवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली.

आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार

  • विहिरी आणि बोअरवेल यांची साफसफाई, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व कामांमुळे वेंगुर्ला  शहर  पाणीटंचाई मुक्त झाले आहे.
  • वेंगुर्ला नगरपरिषद सद्यस्थितीत रोज १० लाख लिटर पाणी पुरवठा करीत आहे. १५ जूनपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
  • पाऊस लांबणीवर गेल्यास आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार आहे. शहरात एकूण १२५० नळधारक असून  ९६ टक्के पाण्याच्या कराची वसुली करण्यात आली आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी