शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वेंगुर्ला शहराची पाणीटंचाईवर अखेर मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:40 IST

प्रथमेश गुरव वेंगुर्ला  : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच ...

प्रथमेश गुरववेंगुर्ला  : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करून हॉटेल व्यावसायिकांमध्ये जाणवत होता. परंतु, पाणीटंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर वेंगुर्ला शहर पाणीटंचाईमुक्त झाले आहे. गतवर्षीपासून शहरात पाणीटंचाई भासत नसल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.गेली काही वर्षे वेंगुर्ला शहर पाणी टंचाईच्या संकटात सापडले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी याचा ताळमेळ साधणे म्हणजे प्रशासनाला एकप्रकारची डोकेदुखी ठरली होती. पाऊस पडेपर्यंत सर्वांना पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणी कपात करणे गरजेचे बनले होते. त्यामुळे सुरुवातीला एक दिवस आड, त्यानंतर दोन दिवस तर पाऊस लांबणीवर जात असल्याचे लक्षात येताच तीन दिवस आड पाणीपुरवठा केला जायचा. पर्यटनाच्यादृष्टीने पाणी टंचाईच्या संकटावर मात करणे गरजेचे होते. दरम्यान, निशाण तलावाची अडीच मीटरने वाढवलेली उंची पाणीटंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली.तलावाची उंची वाढविल्याने जास्त प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक राहिला. त्याचबरोबरच पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइन बदलण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाइपलाइनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाइपलाइनवरचे व्हाॅल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे २०१७ पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून १ लाख लिटर पाण्याची टाकी व चंद्रभागा विहीर आदी कामे मंजूर करून ती पूर्णत्वासही नेली.

नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानसभविष्यात नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस असून यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी शासनस्तरावर केली आहे. तर शहरातील दाभोली नाक्यापर्यंत आलेले तिलारीचे पाणी निमुजगा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या सर्व उपायांना यश आल्यास शहरात मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.

नवीन विंधन विहीर बांधलीअग्निशमन केंद्राजवळ २ लाख लिटर पाण्याची टाकी व विहीर, गाडीअड्डा येथील ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नवीन विंधन विहीर बांधण्यात आली.  नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविली. आनंदवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली.

आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार

  • विहिरी आणि बोअरवेल यांची साफसफाई, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व कामांमुळे वेंगुर्ला  शहर  पाणीटंचाई मुक्त झाले आहे.
  • वेंगुर्ला नगरपरिषद सद्यस्थितीत रोज १० लाख लिटर पाणी पुरवठा करीत आहे. १५ जूनपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
  • पाऊस लांबणीवर गेल्यास आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार आहे. शहरात एकूण १२५० नळधारक असून  ९६ टक्के पाण्याच्या कराची वसुली करण्यात आली आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी