शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 15:57 IST

कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा  मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ११० कोटी ७६ लाख रुपये प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी केली. 

ठळक मुद्देमुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दावैभव नाईक यांनी वेधले लक्ष, प्रस्तावावर त्वरीत कार्यवाहीची मागणी 

नागपूर : कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा  मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ११० कोटी ७६ लाख रुपये प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी केली. 

कुडाळ शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण क्रमांक ६६ मध्ये कुडाळ शहरांत प्लाय ओव्हर व्हावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॉक्सवेल व अंडरपास बांधण्यात यावे, अशी मागणी कुडाळ बचाव समितीच्यावतीने करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाने अपेक्षित कारवाई केली नाही. ठेकेदार कंपनी मनमानी करत आहे. त्यातच अपेक्षित माहिती न दिल्याने बचाव समितीने महामार्ग बंदचे आपले आंदोलन कायम ठेवले आहे.हे आंदोलन अधिक तीव्र व्हावे यासाठी प्रकल्पबाधीत गावात जाऊन बचाव समितीने जनतेचे प्रबोधन केले आहे.  प्रशासनाच्यावतीने आंदोलन थांबविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या उपराजधानीत (नागपूर) सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यात सुरू असलेल्या ११० कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रस्तावाकडे विधानसभेत लक्ष वेधले.कुडाळ बचाव समितीने मंगळवारी पुकारलेल्या महामार्ग बंद आंदोलनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेत आमदार नाईक यांच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने शासन हा प्रस्ताव मंजूर करते का? याकडे तमाम कुडाळ वासियांसह जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गVaibhav Naikवैभव नाईक