शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:09 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी येथे आयोजित खास कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहत्तींना रोखण्यासाठी आंबोली वनविभागाची खास कार्यशाळाभविष्यात ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेणार कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित

आंबोली : अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी सोमवारी येथे आयोजित केलेल्या खास कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिरत्या पथकाचे प्रमुख उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे, सुभाष पुराणिक आदी उपस्थित होते.

प्रकाश बागेवाडी म्हणाले, हत्तींबाबतच्या सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सर्वांनी जागरुक होणे गरजेचे आहे. हत्ती पकडणे हेच आपल्या हातात राहिले आहे. त्यामुळे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हत्तींबाबत काम करावे, असे आवाहन बागेवाडी यांनी केले. तसेच हत्तींना पकडून येथेच ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे असे सांगतानाच हत्तींचे लोकेशन वारंवार तपासत रहावे, असेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच हत्तींना पकडणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत हत्तींसाठी लवकरच कॅम्पची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या एकदिवसीय कार्यशाळेला कोल्हापूर व सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात अधिकारी व वन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमागचा उद्देश स्पष्ट करताना वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, जनता व कर्मचारी यांच्यात होणारे संघर्ष याबाबत कार्यशाळेत विचारमंथन झाले. तसेच नव्याने कशा पध्दतीने हत्ती हटाव मोहीम राबवावी यावर चर्चा झाली.

आजरा, आंबोली भागात फिरणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. कार्यशाळेच्या दरम्यान वनरक्षक तसेच वनपालांना विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, ग्रामस्थ तसेच वन कर्मचारी यांच्यामध्ये उद्भवणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा कार्यशाळेचा समारोप झाला. भविष्यात हत्तींपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :konkanकोकणforestजंगल