शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:09 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी येथे आयोजित खास कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहत्तींना रोखण्यासाठी आंबोली वनविभागाची खास कार्यशाळाभविष्यात ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेणार कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित

आंबोली : अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी सोमवारी येथे आयोजित केलेल्या खास कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिरत्या पथकाचे प्रमुख उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे, सुभाष पुराणिक आदी उपस्थित होते.

प्रकाश बागेवाडी म्हणाले, हत्तींबाबतच्या सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सर्वांनी जागरुक होणे गरजेचे आहे. हत्ती पकडणे हेच आपल्या हातात राहिले आहे. त्यामुळे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हत्तींबाबत काम करावे, असे आवाहन बागेवाडी यांनी केले. तसेच हत्तींना पकडून येथेच ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे असे सांगतानाच हत्तींचे लोकेशन वारंवार तपासत रहावे, असेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच हत्तींना पकडणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत हत्तींसाठी लवकरच कॅम्पची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या एकदिवसीय कार्यशाळेला कोल्हापूर व सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात अधिकारी व वन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमागचा उद्देश स्पष्ट करताना वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, जनता व कर्मचारी यांच्यात होणारे संघर्ष याबाबत कार्यशाळेत विचारमंथन झाले. तसेच नव्याने कशा पध्दतीने हत्ती हटाव मोहीम राबवावी यावर चर्चा झाली.

आजरा, आंबोली भागात फिरणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. कार्यशाळेच्या दरम्यान वनरक्षक तसेच वनपालांना विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, ग्रामस्थ तसेच वन कर्मचारी यांच्यामध्ये उद्भवणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा कार्यशाळेचा समारोप झाला. भविष्यात हत्तींपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :konkanकोकणforestजंगल