शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:09 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी येथे आयोजित खास कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहत्तींना रोखण्यासाठी आंबोली वनविभागाची खास कार्यशाळाभविष्यात ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेणार कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित

आंबोली : अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात यावर सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील वन अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी सोमवारी येथे आयोजित केलेल्या खास कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फिरत्या पथकाचे प्रमुख उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक विजय सुर्वे, सुभाष पुराणिक आदी उपस्थित होते.

प्रकाश बागेवाडी म्हणाले, हत्तींबाबतच्या सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सर्वांनी जागरुक होणे गरजेचे आहे. हत्ती पकडणे हेच आपल्या हातात राहिले आहे. त्यामुळे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हत्तींबाबत काम करावे, असे आवाहन बागेवाडी यांनी केले. तसेच हत्तींना पकडून येथेच ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे असे सांगतानाच हत्तींचे लोकेशन वारंवार तपासत रहावे, असेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच हत्तींना पकडणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत हत्तींसाठी लवकरच कॅम्पची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या एकदिवसीय कार्यशाळेला कोल्हापूर व सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात अधिकारी व वन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमागचा उद्देश स्पष्ट करताना वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, जनता व कर्मचारी यांच्यात होणारे संघर्ष याबाबत कार्यशाळेत विचारमंथन झाले. तसेच नव्याने कशा पध्दतीने हत्ती हटाव मोहीम राबवावी यावर चर्चा झाली.

आजरा, आंबोली भागात फिरणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. कार्यशाळेच्या दरम्यान वनरक्षक तसेच वनपालांना विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, ग्रामस्थ तसेच वन कर्मचारी यांच्यामध्ये उद्भवणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी काय करता येईल, यावरही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला सुमारे शंभर ते दीडशे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा कार्यशाळेचा समारोप झाला. भविष्यात हत्तींपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :konkanकोकणforestजंगल