शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

सिंधुदुर्गात अवकाळी वादळी पावसाचा शिडकावा, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:04 IST

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्ग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि काही जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. त्यानुसार कणकवली तालुक्यातील जानवली व काही भागात गुरूवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला.या पावसासोबत वादळी वारेदेखील वाहत असल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या वादळी पावसाचा जाेर काही मिनीटातच आटोपला. ज्याठिकाणी ढग आले होते. तेथे हा पाऊस पडला. मात्र, तो संततधार बरसला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यातसध्या भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे भातकापणीचा हंगाम लांबला आहे. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली होती. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. उष्णतेचे प्रमाण अचानक वाढले होते. तर गुरूवारी सकाळपासूनच थंडी गायब झाली होती आणि ढगाळ वातावरण होते.

आता पाऊस थांबून कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षायावर्षी पावसाळा सहा महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू व इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस