शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्गात अवकाळी वादळी पावसाचा शिडकावा, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:04 IST

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्ग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि काही जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. त्यानुसार कणकवली तालुक्यातील जानवली व काही भागात गुरूवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला.या पावसासोबत वादळी वारेदेखील वाहत असल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या वादळी पावसाचा जाेर काही मिनीटातच आटोपला. ज्याठिकाणी ढग आले होते. तेथे हा पाऊस पडला. मात्र, तो संततधार बरसला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यातसध्या भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे भातकापणीचा हंगाम लांबला आहे. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली होती. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. उष्णतेचे प्रमाण अचानक वाढले होते. तर गुरूवारी सकाळपासूनच थंडी गायब झाली होती आणि ढगाळ वातावरण होते.

आता पाऊस थांबून कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षायावर्षी पावसाळा सहा महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू व इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस