शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात अवकाळी वादळी पावसाचा शिडकावा, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:04 IST

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

सिंधुदुर्ग : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि काही जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. त्यानुसार कणकवली तालुक्यातील जानवली व काही भागात गुरूवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला.या पावसासोबत वादळी वारेदेखील वाहत असल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या वादळी पावसाचा जाेर काही मिनीटातच आटोपला. ज्याठिकाणी ढग आले होते. तेथे हा पाऊस पडला. मात्र, तो संततधार बरसला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यातसध्या भातकापणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे भातकापणीचा हंगाम लांबला आहे. पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली होती. बुधवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. उष्णतेचे प्रमाण अचानक वाढले होते. तर गुरूवारी सकाळपासूनच थंडी गायब झाली होती आणि ढगाळ वातावरण होते.

आता पाऊस थांबून कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षायावर्षी पावसाळा सहा महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू व इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस