शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

ही तर विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा, नितेश राणे यांचे टीकास्त्र 

By सुधीर राणे | Updated: February 5, 2024 18:54 IST

कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून आमच्याशी लढा द्यायला विरोधकांकडे ...

कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून आमच्याशी लढा द्यायला विरोधकांकडे उमेदवार नाही. त्यामुळे आम्हाला रोखू शकत नसल्याने  कणकवलीत सभा घेत शिव्या घालण्याचे काम काही लोकांकडून झाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केले? हे त्यांना सभेत सांगता आले नाही. त्यामुळे भाजपा आणि राणे कुटुंबियांवर विरोधकांनी फक्त टीका केली. कालची ठाकरे सेनेची सभा म्हणजे खासदार विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा झाली असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.तसेच एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे भाजपा सोबत विनाअट युती करण्यासाठी प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी द्यायचा अशी सध्याची स्थिती आहे.असा गौप्यस्फोट ही त्यांनी यावेळी केला. कणकवली येथे आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राणे म्हणाले, ठाकरे सेनेची रविवारी सभा झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला नाहक त्रास झाला. मला अनेक लोकांचे फोन आले. ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर टीका केली, त्यांना आम्ही मतदानातून उत्तर देणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून गावागावात विकासकामांची भूमिपूजने केली आहेत. त्यामुळे मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. विकास करण्यासाठी माझ्या मतदारांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने  वातावरण खराब करायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे.उद्धव ठाकरे मोठे गद्दार उद्धव ठाकरे हे किती मोठे गद्दार आहेत, हे राज्याने पाहिले होते. मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा सोबत युती असताना कणकवलीत माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा केला. स्वतः जाहीर सभा घेतली. तरीही २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने मी विजयी झालो. ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के पेक्षा जास्त सरपंच भाजपाच्या विचारांचे निवडून आले आहेत. काही त्यांचे आले तेही आमच्याकडे प्रवेशासाठी वेटींगवर आहेत. तसेच काल जे व्यासपीठावर होते, त्यांचेही मत लवकरच बदलेल. माझे आणि जनतेचे अतुट नाते आहे. जो कोण विरोधी उमेदवार उभा राहील त्याच्या विरोधात मी लढणार आहे. कालच्या सभेत जिल्हाभरातून तसेच राजापूरमधून लोक आणले. कोकणात बाळासाहेब ठाकरे यांची लाखोंची सभा होत होती. आता उद्धव ठाकरे कॉर्नर सभा घेत फिरत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.राणे संपले म्हणाचं, पण..विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक आहे. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. आता माझ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आम्ही बोलू. एका बाजूला बोलायचे राणे संपले, मग बांदा ते खारेपाटण पर्यंत राणेंचे नाव घेतल्याशिवाय तुमची एकही सभा का होत नाही ? याचे उत्तर ठाकरे सेनेच्या लोकांनी द्यावे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Rautविनायक राऊत