वीज पडल्याने दोन बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:05 PM2019-07-18T17:05:16+5:302019-07-18T17:07:27+5:30

कणकवली तालुक्यातील नाटळ येथील दीनानाथ पंढरी सावंत यांच्या दोन बैलांवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यामुळे दीनानाथ सावंत यांचे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Two bulls killed due to lightning | वीज पडल्याने दोन बैल ठार

वीज पडल्याने दोन बैल ठार

Next
ठळक मुद्देवीज पडल्याने दोन बैल ठारदीनानाथ सावंत यांचे ६५ हजार रुपयांचे नुकसान

कणकवली : तालुक्यातील नाटळ येथील दीनानाथ पंढरी सावंत यांच्या दोन बैलांवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यामुळे दीनानाथ सावंत यांचे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दीनानाथ सावंत यांनी रविवारी सायंकाळी आपल्या दोन बैलांना चरण्यासाठी सोडले होते. यावेळी बैलांवर अचानक वीज कोसळली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यातील एका बैलाची ३० हजार तर दुसऱ्या बैलाची ३५ हजार रुपये किंमत होती.

ऐन शेतीच्या हंगामात सावंत यांचे बैल गतप्राण झाल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. या घटनेची माहिती समजताच तलाठी तसेच महसूलच्या पथकाने पाहणी करून पंचयादी घातली. या घटनेची नोंद कणकवली तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
दरम्यान, कणकवलीत बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

Web Title: Two bulls killed due to lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.