शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 1:55 AM

केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल.

सावंतवाडी : केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल. पण चिपी विमानतळाला फक्त २५ परवानग्या असताना पालकमंत्री दीपक केसरकर हे आपल्या स्वत:च्या हट्टापायी बुधवारी खासगी उद्योजकांचे विमान उतरवत आहेत, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली. जर सरकारी कार्यक्रम असेल तर केसरकर यांनी त्या विमानात बसून यावे, असे जोरदार आवाहनही आमदार राणे यांनी दिले आहे.आमदार नितेश राणे हे गोव्यावरून कणकवलीकडे जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमानचे अध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, मनीष दळवी, सभापती पंकज पेडणेकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक आदी उपस्थित होते.आमदार राणे म्हणाले, चिपी विमानतळावर बुधवारी ट्रायल विमान उतरवण्यात येणार आहे. मात्र, या विमान उतरण्यास अद्यापपर्यंत केंद्र सरकार किंवा विमान पत्तन विभागाची कोणतीही परवानगी मिळाली नाही. प्रत्यक्षात ६५ परवानग्यांची गरज असताना अद्यापपर्यंत २५ परवानग्या मिळाल्या आहेत. असे असताना मंत्री केसरकर हे स्वत:च्या हट्टासाठी खासगी उद्योजकांचे विमान उतरवत आहेत.बुधवारी मुंबईहून येणाऱ्या विमानात पायलट, को-पायलट एवढेच जण असणार आहेत. कोणताही अधिकारी किंवा मंत्री असणार नाही. एवढेच काय, विमान उतरवण्याचा सरकारी कार्यक्रम आहे, असे मंत्री केसरकर भासवत आहेत. तर त्यांनी स्वत: या विमानातून आले पाहिजे होते. ते का येत नाहीत, असा सवाल आमदार राणे यांनी केला आहे. तसेच विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे बुधवारी रात्री मालवणला येत आहेत. मग ते ट्रायल लँडिंगसाठी दुपारी का येत नाहीत? यावरूनच जनतेची फसवणूक करण्याचे काम मंत्री केसरकर यांनी सोडून द्यावे. मी स्वत: याबाबत विमान पत्तनच्या अधिकाºयांशी बोललो आहे. त्यांनी मला सविस्तर माहिती दिली असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.जे खासगी विमान उतरणार आहे, त्यातून गणपतीची मूर्तीही आणण्यात येणार आहे. यातून भावनिकतेचे राजकारण करण्याचा मंत्री केसरकर यांचा डाव आहे. आम्ही यातून कोणतेही राजकारण करणार नाही किंवा त्यांना विरोध करणार नाही. जनतेला सर्व काही हळूहळू समजेल. पण चिपी विमानतळावर खासगी उद्योजकांचे विमान उतरत असतील तर आमचेही विमान उतरण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी विमान पत्तन विभागाकडे केली असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.एकेकाळी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून चिपीकडे पाहिले जात होते. पण आता विमानतळाची धावपट्टी कमी करण्यात आली आहे. गोव्याचे मोपा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी  चिपी विमानतळाचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. यामागे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात असून, ते खºया अर्थाने कोकणचे कसई आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.चौकटमंत्री केसरकर यांनी स्वत:ची बेरोजगारी दूर केलीबांदा येथे आयटी हब आणण्यात आली. मात्र त्याचे मुख्य कार्यालय हे आपल्या इमारतीत ठेवले. जेणे करून आपणास अडीच ते तीन लाख भाडे मिळावे. हीच त्याच्या मागची धारणा आहे. जनतेची बेरोजगारी दूर करण्यापेक्षा मंत्री केसरकर यांनी स्वत:ची बेरोजगारी दूर केली आहे. एवढी कॉम्प्लेक्स आहे, मग यांना आपलेच कॉम्प्लेक्स कसे काय दिसले, असा सवालही आमदार राणे यांनी केला आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर